औरंगाबाद : गेल्या काही दिवसात काँग्रेस नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक करताना दिसत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होतोय याचा आम्हाला आनंद आहे’, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी गडकरींचे कौतुक केले आहे.
केंद्रातील भाजप सरकारची एकूणच कामगिरी उणेच असली तरी केंद्रीय मंत्रिमंडळातील रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणजे चुकीच्या पक्षातील चांगला आणि कार्यक्षम माणूस असे त्यांचे वर्णन करावे लागेल, असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले आहे.
गडकरींचे अधिकार काढून घेण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून केले जातात. त्यांची कोंडी केली जात आहे, असे देखील अशोक चव्हाण यांनी म्हणाले. मोदी सरकारला सात वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने अशोक चव्हाण बोलत होती. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी देखील महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान झाला तर आनंदच आहे, असे म्हटले होते. कोरोनामुळे देशभरात कोट्यवधी लोकांचा मृत्यू होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याचं सोयरसुतक नाही. नरेंद्र मोदींच्या जागी नितीन गडकरी पंतप्रधान असायला हवे होते असं वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते.
Read Also :
- … म्हणून निलेश लंकेंनी मनसे पदाधिकाऱ्याला बजावली 1 कोटींची नोटीस
- ‘अनिल परब फक्त दोन महिन्यांचे पाहुणे’
- ‘महाराष्ट्रातील 12 कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी असलेला चेक वठणार कधी?’
- ‘70 वर्षांत जे कमवलं ते सगळं 7 वर्षात मोदी सरकारने विकायला काढलं’
- 12वीच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री ठाकरेंनी पंतप्रधानांकडे केली ‘ही’ मागणी, म्हणाले…