मुंबई : गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीतील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा पाठिमागे लागला आहे. अशातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. त्यांची अलिबाग येथील मालमत्ता इडीने जप्त केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलचं तापण्याची शक्यता आहे. त्यावर आता मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी त्यांच्यावर खोचक टीका केली आहे.
एखाद्या किल्ल्याचे बुरुज ढासाळायला लागले ना की..; वसंत मोरेंची मुस्लिम कार्यकर्त्यांच्या घरी भेट
अमेय खोपकर म्हणाले की, राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावर कारवाई करायला सांगितली होती. मात्र इडीने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच कारवाई केली आहे. त्यामुळे यावर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस काय प्रतिक्रिया देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अलिकडेच संजय ऱाऊत यांच्या मुलीचं लग्न पार पाडलं. त्यावेळी त्या लग्नात मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याचा आरोप भाजपच्या काही नेत्यांनी केला होता. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबांची ईडीकडून चौकशी देखील करण्यात आली होती. त्यामुळे अशातच आता अलिबागमधील जमीन आणि मुंबईतील एक फ्लॅट जप्त करण्यात आल्याची माहिती मिळतेय. भाजप नेते किरीट सोमय्या याबाबत पत्रकार परिषद घेऊन् माहिती देणार आहेत.
राज ठाकरेंचा आदेश हा अंतिम; वसंत मोरेंच्या भूमिकेनंतर मनसेत दोन प्रवाह
संजय राऊत यांची अलिबागजवळील किहीमधील 8 भुखंड जप्त करण्यात आलं आहे. तसेच ईडीने 1 हजार 48 कोटींच्या प्रविण राऊत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याचं म्हटलं जात आहे. संजय राऊतांचे स्नेही प्रविण राऊत यांनी घोटाळा केला आहे. यामध्ये संजय राऊत हे देखील सहभागी आहेत. त्यांच्या पत्नीच्या खात्यात देखील पैसा आलं आहे. असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
“कोल्हापूर उत्तरेत सत्यजित कदम मतदानाआधीच विजयी”; चंद्रकांत पाटलांचा दावा
दरम्यान, ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाई केल्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी सत्यमेव जयते असं म्हटलं आहे. गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीतील अनेक राजकीय नेत्यांवर ईडीने कारवाई केॆली आहे. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर आगामी काही काळातील राजकीय वातावरण कसं असणार ते आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- दिल्लीत शरद पवार, मोदींची भेट! इडीच्या कारवाईनंतर राजकीय घडामोडींना वेग
- गिरीश महाजन जिलेबी, संजय राऊत सुरी तर किरीट सोमय्या भोंगा; पेडणेकारांची जोरदार फटकेबाजी
- एसटी कर्मचाऱ्यांनो हजर व्हा..! उच्च न्यायालयाने दिले १५ एप्रिल पर्यंत हजर राहण्याचे आदेश
- आयएनएस विक्रांत प्रकरण! किरीट सोमय्यांचं संजय राऊतांना आव्हान
- आयएनएस विक्रांतचा ७० कोटी रुपयांचा निधी गेला कुठे? सोमय्यांकडे बोट दाखवत राऊतांचा सवाल