मुंबई : अमरावतीचे अपक्ष आमदार बच्चू कडू आपल्या वेगवेगळ्या कारणांमुळे राजकीय क्षेत्रात नेहमी चर्चेत राहतात. अशातच रस्त्याच्या कामानिमित्ताने गेलेल्या बच्चू कडूंनी सर्वांसमोर आपल्याच कार्यकर्त्यांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगू लागली आहेत. तसेच अनेक ठिकाणांहून त्यांच्यावर प्रखर शब्दात टिका केली जात आहे.
“माझा पक्ष, विचार वेगळे पण मी पंकजा मुंडेंच्या पाठीशी”; रूपाली पाटील
अचलपुर तालुक्यातील गणोजा गावात बच्चू कडू एका रस्त्याच्या उद्घाटनासाठी गेले. मात्र रस्त्याच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने गदारोळ झाला आणि संतापलेल्या बच्चू कडूंनी थेट आपल्याच कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. रस्त्याचं काम ज्या भागासाठी मंजूर झालं होतं त्या भागात रस्ता झाला नाही, असा प्रमुख आक्षेप तक्रारकर्त्या केला. तसेच ज्या भागात रस्त्याचं काम झालं नाही तो कुठे गेला असा सवाल केला. यावर बच्चू कडू संतापले आणि मुर्खासारखे काहीही बोलतो असं वक्तव्य केलं.
“मोदींनी जरी ठरवलं तर ते मला संपवू शकत नाही”; पंकजा मुंडेच्या वक्तव्यानंतर राज्यात खळबळ
त्यानंतर बच्चू कडूंनी ठेकेदार आणि इंजिनियरसमोरच कार्यकर्त्यांची बाजू ऐकून घेतली. मात्र, ठेकेदार रस्त्याचं काम योग्य झालं म्हणत होता, एक कार्यकर्ता कामात घोटाळा झाल्याचा आरोप करत होता. त्यावर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी शिंदे सरकारवर प्रखरशब्दात टिका केली आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या बंडखोर आमदारांना सत्तेचा माज आला आहे. कायदा सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना गृहमंत्री काय करतात? लोकप्रतिनिधी आता प्रश्न विचारणाऱ्याच्या कानशिलात मारू लागलेत. बंडखोर आमदार बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांच्या कानशिलात लगावली. हा मंत्रीपद न मिळल्याचा राग आहे का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
Read also
- अन् बच्चू कडूंनी थेट कार्यकर्त्यांच्याच कानशिलात लगावली..! व्हिडीओ व्हायरल
- “बिहार पेक्षा वाईट परिस्थिती आज महाराष्ट्रात भाजपने करून ठेवलीय”
- “निवडणुक आयोगावर कुठेही शिंतोडे उडणार..;” शिवसेना प्रकरणावर आंबेडकरांची प्रतिक्रिया
- केंद्र सरकारकडून पीआयएन संघनेवर पाच वर्षाची बंदी..! सोमय्यांनी थेट फंडींगचं कनेक्शन जोडलं
- “खडसे, तावडे, मुंडेंनंतर आता फडणवीस गिरीश महाजनांचाही राजकीय काटा काढणार”?