मुंबई : काल सर्वोच्च न्यायालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या याचिकांवर सुनावणी करण्यात आली. दोन्ही बांजूच्या वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. तर शिवसेनेच्या निवडणुक चिन्हांबाबतची उद्धव ठाकरे यांनी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानंतर राज्यात एकच राजकीय चर्चा रंगू लागल्या. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
“कमळाबाईच्या मराठी दांडियाने इंचभरही हलणार नाही”; सेनेकडून भाजपचा पुन्हा एकदा ‘कमळाबाई’ उल्लेख
शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठाने दिलेल्या निर्णयामुळे चुकीचा संदेश गेला आहे. या निर्णयामुळे संविधान आणि संसदेने आतापर्यंत राखून ठेवलेला निवडणुक आयोगाचा तटस्थपणा नष्ट झाला आहे. त्यामुळे घटनापीठाकडे या निर्णयाचा फेरविचार करावा. असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. शिवसेनेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा बंधनकारक आहे, पण त्याचा आदर होईल किंवा नाही, याबाबत मला शंका आहे. असंही ते म्हणाले.
“देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार”; एकनाथ शिंदे
संविधानाने आणि संसदेने ही दक्षता घेतली पाहिजे की, निवडणुक आयोग कुठेही पक्षपाती होणार नाही. निवडणुक आयोगावर कुठेही शिंतोडे उडणार नाहीत. याची काळजी घेतली पाहिजे. निवडणुक आयोगाने स्वत:च्याच अधिकाराचा वापर करत पक्षचिन्हाबाबत १९६८ सालचा कायदा तयार केला होता. या कायद्यातील कलम १५ वादग्रस्त आहे. त्यानुसार एखाद्या पक्षात चिन्हाबाबत वाद झाला तर निवडणुक आयोगाला हस्तक्षेप करण्याचे अधिकार प्राप्त झाले होते. असंही ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाला पहिल्यांदाच ही संधी चालून आली होती की, कलम १५ हे संवैधानिक आहे किंवा नाही, याची तपासणी करता आली. दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाने ती तपासणी केली नाही. परिणामी आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयात आणि संसदेने राखून ठेवलेला निवडणुक आयोगाची तटस्थता या निर्णयामुळे नष्ट झाली आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षचिन्हाचा निर्णय हा निवडणुक आयोगच घेईल, असा चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाचे पुनवरालोकन करणे गरजेचे आहे. असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
Read also
- केंद्र सरकारकडून पीआयएन संघनेवर पाच वर्षाची बंदी..! सोमय्यांनी थेट फंडींगचं कनेक्शन जोडलं
- “खडसे, तावडे, मुंडेंनंतर आता फडणवीस गिरीश महाजनांचाही राजकीय काटा काढणार”?
- “माझा पक्ष, विचार वेगळे पण मी पंकजा मुंडेंच्या पाठीशी”; रूपाली पाटील
- “मोदींनी जरी ठरवलं तर ते मला संपवू शकत नाही”; पंकजा मुंडेच्या वक्तव्यानंतर राज्यात खळबळ
- “त्यांची आता जळजळ, मळमळ, कळकळ सुरूय”; भाजपचं शिवसेनेला प्रत्युत्तर