मुंबई : मागच्या निवडणुकीमध्ये राज्यातील ज्या काही महानगरपालिका भाजपच्या ताब्यात होत्या. त्या सर्व महानगरपालिकेमध्ये बिल्डारांना एखादी इमारत बांधायची असेल तर महापालिकेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागत होते. यासंदर्भात अनेक तक्रारी माझ्याकडे लोकांच्या आल्या आहेत. ज्या लोकांनी या लोकांना पैसे दिले नाहीत. त्यांना त्यांच्या घरावर हल्ले तसेच इडीची भीती निर्माण केली आहे. अशा अनेक तक्रारी मला आकोल्यातून आल्या आहेत. बिहार पेक्षा वाईट परिस्थिती आज महाराष्ट्रात भाजपने करून ठेवली आहे. असा घणाघात काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल अकोल्यात केला आहे.
“त्यांची आता जळजळ, मळमळ, कळकळ सुरूय”; भाजपचं शिवसेनेला प्रत्युत्तर
अकोल्यातील टाकळी येथे काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेशमामा म्हैसने यांच्या निवासस्थानी भेट दिली व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच त्यांच्या निवासस्थानी जमलेल्या सर्व शेतकरी व वारकरी बांधवांशी संवाद साधला. तसेच काल त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर कडाडून टिका केली. पीएपआय संस्थेवर केंद्र सरकारकडून पाच वर्षाची बंदी घातली आहे. त्यावर देखील त्यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे.
“कमळाबाईच्या मराठी दांडियाने इंचभरही हलणार नाही”; सेनेकडून भाजपचा पुन्हा एकदा ‘कमळाबाई’ उल्लेख
भारत आणि पाकिस्तान असा वाद निर्माण करून राजकारण करणारी लोकं केंद्रात बसलेली आहेत. देशात दहशतवाद्यांना मदत करणारी अनेक कार्यालयं उघडली गेली आहेत. ही कार्यालयं केंद्राने अगोदर बंद करायला हवीत. मात्र सरकार यांच्या पाठीशी आहे. म्हणूनच पुण्यात पाकिस्तान झिंदाबादचे नारे देण्यात आले. या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी आमची मागणी होती असं देखील नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
Read also
- “निवडणुक आयोगावर कुठेही शिंतोडे उडणार..;” शिवसेना प्रकरणावर आंबेडकरांची प्रतिक्रिया
- केंद्र सरकारकडून पीआयएन संघनेवर पाच वर्षाची बंदी..! सोमय्यांनी थेट फंडींगचं कनेक्शन जोडलं
- “खडसे, तावडे, मुंडेंनंतर आता फडणवीस गिरीश महाजनांचाही राजकीय काटा काढणार”?
- “माझा पक्ष, विचार वेगळे पण मी पंकजा मुंडेंच्या पाठीशी”; रूपाली पाटील
- “मोदींनी जरी ठरवलं तर ते मला संपवू शकत नाही”; पंकजा मुंडेच्या वक्तव्यानंतर राज्यात खळबळ