मुंबई : राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार ‘पंतप्रधान’ पदासाठी योग्य की ‘राष्ट्रपती’ पदासाठी? या चर्चा झडत असतात. मात्र, आता आगामी राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीत राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा असल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्र : प्रशांत किशोर यांचं वक्तव्य, शरद पवार हे विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार!
शरद पवारांना राष्ट्रपतीपदाचा चेहरा करण्यासाठी किशोर यांनी, देशभरात मोर्चेबांधणी सुरू केली असून, त्या पार्श्वभूमीवर ते देशभरातील दिग्गज नेत्यांसोबत बैठका घेत आहेत. प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची ३ वेळा भेट घेतली आहे. यापैकी एका बैठकीला पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षाच्या नेत्यांचीही हजेरी होती. तसेच, आज याबाबतीत त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशी संवाद साधला.
“महाराष्ट्र हे काँग्रेसचंच राज्य आहे, २०२४ मध्ये काँग्रेसच नंबर एकची पार्टी”
या पार्श्वभूमीवर, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात ‘पंतप्रधान’ पदाच्या शर्यतीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारच योग्य उमेदवार आहेत. ते ज्येष्ठ नेते आहेत. आगामी निवडणुकीत ते विरोधी पक्षाचा चेहरा बनू शकतात. निवडणुकीत त्यांचा चेहरा पंतप्रधान पदासाठी नसेल, तर मोदींचा पराभव करणे कठीण जाईल आणि विजयी होण्याची शक्यता कमी होईल,” असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, माध्यमांशी बोलताना केला आहे.
कुणाच्याही नेतृत्वात लढा, भाजप ४०० पेक्षा अधिक जागा जिंकणारच – चंद्रकांत पाटील
२०२२ मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार आहे. यामुळे पुढील वर्षभरात राष्ट्रपती निवडणूक होणार आहे. तसेच, तसेच, २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तोडीसतोड आव्हान देण्यासाठी आणि देशातील प्रमुख विरोधीपक्ष म्हणून मोर्चेबांधणी करायची आहे. त्यामुळे शरद पवार विरोधकांकडून दोन्हीपैकी एका पदासाठीचा चेहरा असतील, असं निश्चित मानलं जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
Read Also :
- ठाकरे सरकारने घेतलेले मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय, थोडक्यात.
- ‘‘स्वबळाची तयारी सुरु केली आहे कारण…” नाना पटोलेंनी केला मोठा खुलासा!
- “मुख्यमंत्र्यांनी शिक्षणाचा खेळ मांडून गुणवत्ता संपविण्याचा घाट घातला आहे”
- “पंकजा मुंडे समजूतदार, त्या कधीच बंडाचा विचार करणार नाहीत”- चंद्रकांत पाटील
- “तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा, आम्ही स्वबळावर जेवायला येऊ”, मुख्यमंत्र्यांचे काँग्रेसला चिमटे