मुंबई : मागील कित्येक दिवसांपासून राज्याचे लक्ष हे सिंधुदुर्गाकडे लागले होते. अखेर काळ सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपला ईश्वरचिठीवर विजय मिळाला आहे.
…तर महाराष्ट्रात लॉकडाऊन लावालाच लागेल; मंत्री विजय वडेट्टीवार यांचा गंभीर इशारा
त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राणेंनी म्हटले होते की सिंधुदुर्ग ही फक्त भाजपच्या विजयाची सुरुवात आहे. आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता असेल आणि मुख्यमंत्री देखील आमचाच असेल. त्यावर आता अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी उत्तर दिले आहे. नारायण राणे आणि भाजपाने काही जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकलेली नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत फक्त २५ मते ५० मते असतात. मतदारांचे अपहरण करून, पैशांचा घोडेबाजार करून आणि इतर सर्व काही गोष्टी केल्यानंतर एखादी बँक जिंकल्यानंतर आाता ते राज्य जिंकण्याचं आव्हान देताहेत.
पक्षातील विरोधकांना धडा शिकवणार; नाना पटोलेंचा काँग्रेस नेत्यांना थेट इशारा
हे म्हणजे गल्ली क्रिकेटमध्ये जिंकल्यानंतर वर्ल्डकप जिंकणार असं बोलण्यासारखं आहे.आता जिल्हा बँक जिंकल्यानंतर हे आम्ही महाराष्ट् जिंकू, सत्ता परिवर्तन करू असे दावे करताहेत. ठीक आहे भाजपवाले स्वप्न बघताहेत. आता त्यात आणखी एक व्यक्तीची भर पडली आहे. त्यांना शुभेच्छा, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला. प्रचारात बोल्ट असताना नारायण राणे हे अजित पवार कोण असं विचारत होते. राणेंनी अजित पवारांना ओळखण्याची गरज नाही. संपूर्ण राज्य, देशाला अजित पवार कोण हे माहिती आहे असा टोलाही मालिकांनी राणेंना मारला आहे.
Read also:
- राज्यातील १० हजार कर्मचाऱ्यांचे परतीचे दोर तुटले; एसटीचे १० हजार कर्मचारी थेट निलंबित
- ऐनवेळी बैलगाडा शर्यत रद्द करण्यामागे राजकीय डाव; शिवाजीराव आढाळराव पाटलांचा रोख कुणाकडे?
- कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मावळातील बैलगाडा शर्यत तात्पुरती रद्द – आमदार सुनिल शेळके
- बैलगाडा शर्यतीमुळे युवकांचा एक वर्ग वाया जाणार; राष्ट्रवादीच्या नेत्याने व्यक्त केली चिंता
- दिलीपराव देशमुखांचा हट्ट पुतण्याने पुरवला; लातूरच्या शेतकऱ्यांना ५ लाख रुपये पर्यंत पीक कर्ज शून्य टक्के दराने मिळणार