पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी चिचोडी- आंबेगाव आणि नानोलीतर्फे चाकण ता. मावळ येथील बैलगाडा शर्यतीची परवानगी पुढील आदेश येईपर्यंत स्थगित ठेवण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश आहेत. मात्र, शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, ऐनवेळी बैलगाडा शर्यत रद्द करून बैलगाडा मालकांचा हिरमोड झाला आहे, परंतू, शर्यत झाली असती तर माझे नाव झाले असते, त्यामुळे, ऐनवेळी शर्यत रद्द करण्याचा घाट घातला, यामागे राजकीय षडयंत्र असल्याचे दिसून येते, अशा शब्दात आढाळाराव पाटलांनी रोष व्यक्त केला. परंतू, व्यक्त होत असताना पाटलांचा रोख नेमका कुणाकडे होता? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
‘राजन तेली यांची मोठी मेहनत, खचू नका, जोमानं कामाला लागा‘, फडणवीसांचा सल्ला
बैलगाडा शर्यत अचानक रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अर्धा तास ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील काही नेत्यांनी मी भरविलेली बैलगाडा शर्यत हणून पाडली. ही मोठी शर्यत होईल आणि माझं नाव मोठं होईल म्हणून ही खेळी केली असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. अचानक शर्यत रद्द झाल्याने बैलगाडा मालक-चालक, शौकीन नाराजी व्यक्त करतायेत. जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी काल सायंकाळी सहा वाजता अहवाल मागवला. तेव्हा त्यांनी शर्यतीला संमती दिली आणि रात्री उशिरा अचानक शर्यतीला स्थगिती दिली. यावेळी पाटील यांनी प्रशासनावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
तू आम्हाला टेन्शनमध्ये पाठवलंस, मी आंघोळ करता करता थांबलो – नारायण राणे
16 डिसेंबरला सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली होती. राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली होती. या निर्णयामुळं राज्यातील बैलगाडा मालकांना दिलासा मिळाला आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर 16 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली होती. त्याआधीच्या सुनावणीवेळी याबाबत इतर राज्यांना नोटीस बजावण्यात आली होती. तसेच त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. 2017 साली मुंबई हायकोर्टानं बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. याला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आता या शर्यतींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. सात वर्षांनंतर या निर्णयामुळं बैलगाडा शर्यत पुन्हा राज्यात सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Read also:
- कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मावळातील बैलगाडा शर्यत तात्पुरती रद्द – आमदार सुनिल शेळके
- बैलगाडा शर्यतीमुळे युवकांचा एक वर्ग वाया जाणार; राष्ट्रवादीच्या नेत्याने व्यक्त केली चिंता
- दिलीपराव देशमुखांचा हट्ट पुतण्याने पुरवला; लातूरच्या शेतकऱ्यांना ५ लाख रुपये पर्यंत पीक कर्ज शून्य टक्के दराने मिळणार
- पक्षातील विरोधकांना धडा शिकवणार; नाना पटोलेंचा काँग्रेस नेत्यांना थेट इशारा
- …तर महाराष्ट्रात लॉकडाऊन लावालाच लागेल; मंत्री विजय वडेट्टीवार यांचा गंभीर इशारा