मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. सरकारने निर्णायक पगारवाढीचा निर्णय घेतल्यानंतरही संप मागे घेण्यात आलेला नाही. परिवहनमंत्री अनिल परब यांनी अनेकदा कर्मचारी संघटनांशी चर्चा करूनही संप फुटेनासा झाला आहे.
‘राजन तेली यांची मोठी मेहनत, खचू नका, जोमानं कामाला लागा‘, फडणवीसांचा सल्ला
मागील एकही दिवसांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या कनिष्ठ श्रेणी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर आणि अनिल परब यांच्यात एक बैठक झाली होती. त्यानंतर संप माघारी घेण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. असं असतानाही अजूनही कर्मचारी कामावर न परतल्याने सर्वसामान्य जनतेचा खोळंबा झाला आहे.
तू आम्हाला टेन्शनमध्ये पाठवलंस, मी आंघोळ करता करता थांबलो – नारायण राणे
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार परिवहनमंत्री अनिल परब यांनी साडेदहा हजार संपकरी कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. याबाबतच्या सुनावण्यांना कर्मचारी गैरहजर राहिल्याने आता सातशे कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. सरकारने केलेल्या बडतर्फीच्या कारवाईनंतर अनेक कर्मचाऱ्यांनी आगारात जाऊन रुजूकरून घेण्याची विनंती करण्यास सुरूवात केली आहे. मात्र मध्यवर्ती कार्यालयानेयाबाबतची सूचना दिली नसल्यानेआगारप्रमुखांनी त्यांना रुजू करून घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची परतीची वाट बंद झाली आहे.
…तर महाराष्ट्रात लॉकडाऊन लावालाच लागेल; मंत्री विजय वडेट्टीवार यांचा गंभीर इशारा
विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना वारंवार आवाहन करूनही तेरुजून झाल्यानेएसटी महामंडळानेनिलंबनाची कारवाई केली. त्यानंतर कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे एसटी महामंडळानेशिस्त आवेदन कार्यपद्धतीनुसार निलंबित कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरू केली आहे.
Read also:
- ऐनवेळी बैलगाडा शर्यत रद्द करण्यामागे राजकीय डाव; शिवाजीराव आढाळराव पाटलांचा रोख कुणाकडे?
- कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मावळातील बैलगाडा शर्यत तात्पुरती रद्द – आमदार सुनिल शेळके
- बैलगाडा शर्यतीमुळे युवकांचा एक वर्ग वाया जाणार; राष्ट्रवादीच्या नेत्याने व्यक्त केली चिंता
- दिलीपराव देशमुखांचा हट्ट पुतण्याने पुरवला; लातूरच्या शेतकऱ्यांना ५ लाख रुपये पर्यंत पीक कर्ज शून्य टक्के दराने मिळणार
- पक्षातील विरोधकांना धडा शिकवणार; नाना पटोलेंचा काँग्रेस नेत्यांना थेट इशारा