मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच चिघळला आहे. यातच मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला २ जानेवारी पर्यंत मुदत दिली आहे. त्यावरून आता राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यातच शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांचा एक कार्टून ट्विट केला आहे. त्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार पलटवार केलाय.
हेही वाचा…“मावळचा खरा सरदार कोण ?” ग्रामपंचायत निकालावरून भाजप अन् राष्ट्रवादीमध्ये जोरदार खडाजंगी
उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असलेला कार्टून ट्विट केला आहे. त्यात मराठा आरक्षण, सर्वपक्षीय समर्थन, आरोप अशा शब्दाचा उल्लेख करण्यात आलाय. तसेज जवा किनाऱ्याला सुरळित लागतंय तवा त्याच्यामधी खोडा घालतोय लुटारू, असं म्हणत सामंतानी ठाकरेंना डिवचलंय.
हेही वाचा…भुजबळांचे मनोज जरांगे पाटलांवर तिखट वार, तर सरकारवर केला हल्लाबोल, राजकारण तापलं..!
दरम्यान, उदय सामंत यांच्या ट्विटरला सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, जवा घोटाळे आणि भ्रष्टाचाराची होते नांगरट, ईडी सीबीआयमुळे पळून जातात, भेदरट निष्ठा आणि ईमानदारीचा अस्त होऊन गद्दारीचा होतो उदय, तवा विश्वासघातकी वहिवाट होते डांबरट असं म्हणत जोरदार टोला लगावला.
जवा घोटाळे आणि भ्रष्टाचाराची होते नांगरट;
ईडी सीबआय मुळे पळून जातात भेदरट
निष्ठा आणि इमानदारीचा अस्त होऊन
गद्दारीचा होतो उदय
तवा
विश्वासघातकी वहिवाट होते “डांबरट”@samant_uday@AUThackeray
@ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @OfficeofUT @rautsanjay61 https://t.co/ECD3xTH1gQ— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) November 6, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“पालिकांच्या निवडणुका घ्यायला यांची हातभर फाटते अन् ग्रामपंचायत निवडणुका..”, राऊतांनी महायुतीला डिवचलं
हेही वाचा…“पंचायत टू पार्लमेंट’ केवळ आणि केवळ आणि चप्पा-चप्पा भाजपा”, ग्रामपंचायत निकालानंतर फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…ग्रामपंचायती निवडणुकीत ठाकरेंना मिळाल्या कमी जागा, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
हेही वाचा…‘या’ तालुक्यात भाजपला एकही जागा जिंकता आली नाही, सगळ्या पक्षांना धक्का देत अपक्षांनी मारली बाजी
हेही वाचा…“तुम्ही तर आमचा जीव घ्यायला निघालेत”? मनोज जरांगे पाटलांचं भुजबळांना जोरदार प्रत्युत्तर