मुंबई : राज्यात काल झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीवर मोठी बाजी मारली आहे. राज्यातील २३५९ ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान झालं होतं. त्यानंतर काल त्याची मतमोजणी करण्यात आली. यामध्ये महायुतीला 1328 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला तर महाविकास आघाडीला फक्त 526 ग्रामपंचायती ताब्यात आल्या आहेत. यावरून आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला डिवचलं आहे.
हेही वाचा…भुजबळांचे मनोज जरांगे पाटलांवर तिखट वार, तर सरकारवर केला हल्लाबोल, राजकारण तापलं..!
काळ मोठा कठिण आला आहे, राज्य अनाडी लोकांच्या हाती गेले आहे. ग्रामपंचायत निवडणुका आम्हीच जिंकल्याचा दावा बरेच गटतट करीत आहेत. या निवडणुका पॅनल पद्धतीने लढवल्या जातात. पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाहीत. त्यामुळे आम्हीच जिंकलो हा दावा पोकळ असल्याचा टोला राऊतांनी महायुतीला लगावला.
हेही वाचा…“आंदोलनामध्ये कुटुंबीय सापडले असते तर वाचलेच नसते,” छगन भुजबळांचं मोठं विधान
पुढे बोलतांना राऊत म्हणाले की, जे लोक विद्यापीठाच्या सेनेट निवडणुका घेण्यास घाबरतात. मुंबईसह १४ महानगरपालिकांच्या निवडणुका घ्यायला यांची हातभर फाटते. ते ग्रामपंचायत निवडणुका आम्हीच जिंकल्याचा गुलाल उधळत आहे. असा जोरदार घणाघात संजय राऊतांनी महायुतीला लगावला.
काळ मोठा कठीण आला आहे.
राज्य अनाडी लोकांच्या हाती गेले आहे.
ग्राम पंचायत निवडणुका आम्हीच जिंकल्याचा दावा बरेच गटतट करीत आहेत.या निवडणुका पॅनल पद्धतीने लढवल्या जातात. पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाहीत. त्यामुळे आम्हीच जिंकलो हा दावा पोकळ आहे.
जे लोक विद्यापीठाच्या सेनेट निवडणुका… pic.twitter.com/PeIjd0P7Ge— Sanjay Raut (@rautsanjay61) November 7, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“पंचायत टू पार्लमेंट’ केवळ आणि केवळ आणि चप्पा-चप्पा भाजपा”, ग्रामपंचायत निकालानंतर फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…ग्रामपंचायती निवडणुकीत ठाकरेंना मिळाल्या कमी जागा, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
हेही वाचा…‘या’ तालुक्यात भाजपला एकही जागा जिंकता आली नाही, सगळ्या पक्षांना धक्का देत अपक्षांनी मारली बाजी
हेही वाचा…“तुम्ही तर आमचा जीव घ्यायला निघालेत”? मनोज जरांगे पाटलांचं भुजबळांना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“मावळचा खरा सरदार कोण ?” ग्रामपंचायत निकालावरून भाजप अन् राष्ट्रवादीमध्ये जोरदार खडाजंगी