मुंबई : तुम्ही तर आमचा जीव वाचवायला आला नाही, पण जे न्यायमूर्ती जीव वाचवायला आले. त्यांच्याबद्दल छगन भुजबळ यांनी आता खालच्या पातळीवर जाऊन बोलायला सुरूवात केली आहे. मराठा समाज काही जास्त काही मागत नाही. आपल्या हक्काचं बोलतोय, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…भाजप आमदार नमिता मुंदडा यांना मोठा धक्का..! जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अजित पवारांच्या ताब्यात
हिंसाचाराचं आम्ही समर्थन करत नाही, मराठा आंदोलनाला गालबोल लागण्यासाठी जाणिवपुर्वकर प्रयत्न केले जात आहेत. मराठ्यांना कुणबी आरक्षण दिल्याने ओबीसींचे आरक्षण कसं संपणार आहे? जे मराठा समाजाच्या हक्काचे आहे, तेच आम्ही मागत आहोत. न्यायाधीश न्यायदानाचं काम करत असतात. त्यांनी जीव वाचवला तर तुम्हाला इतकं काय झालं ? असा सवाल देखील त्यांनी केलाय.
हेही वाचा…नाशकात अजितदादांची दादागिरी, भुजबळांनीही आपला गड राखला
दरम्यान, जालन्यात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यावर भुजबळांनी पोलिसांची बाजू घेऊन आपल्यावर टिका केली. मी तर म्हणतोय की याची सखोल चौकशी करा. तुम्ही जे बोलताय ते खरं असेल तर तुमच्या सरकारकडून चौकशी करा. जे या प्रकरणात बडतर्फ व्हायला पाहिजे होते. ते बाजुलाच राहिलेत आणि कारवाई दुसऱ्या पोलिसांवरच केली असल्याचंही मनोज जरांगे पाटलांनी केलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“मावळचा खरा सरदार कोण ?” ग्रामपंचायत निकालावरून भाजप अन् राष्ट्रवादीमध्ये जोरदार खडाजंगी
हेही वाचा…भुजबळांचे मनोज जरांगे पाटलांवर तिखट वार, तर सरकारवर केला हल्लाबोल, राजकारण तापलं..!
हेही वाचा…“आंदोलनामध्ये कुटुंबीय सापडले असते तर वाचलेच नसते,” छगन भुजबळांचं मोठं विधान
हेही वाचा…छगन भुजबळ यांचा मोठा एल्गार, १७ नोव्हेंबरला ओबीसींचा महामोर्चा, सरकारच्या विरोधात आक्रमक
हेही वाचा…भाजपने तब्बल २०७४ पैकी ६६९ ग्रामपंचायतींवर झेंडा रोवला, मुंबईत मोठा जल्लोष