मुंबई : राज्यात झालेल्या २३५९ ग्रामपंचायतीमध्ये २०७४ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल हाती लागला आहे. यापैकी सर्वात जास्त ६६९ ग्रामपंचायतींवर भाजपने वचर्स्व ठेवलं असून त्याच्या खालोखाल अजित पवार गटाने ३५९ ग्रामपंचायतींवर आपला झेंडा रोवला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर शिंदे गटाच्या ताब्यात २३९ ग्रामपंचायती गेल्या आहेत. यावरून आता भाजपने मुंबईत जल्लोष करण्यात सुरूवात केली आहे.
हेही वाचा…ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ‘या’ मंत्र्यांनी केला प्रचार, परंतु उमेदवाराचा झाला दारून पराभव
महायुतीने जळवपास १२६७ ग्रामपंचायती जिंकल्या असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी नेहमी विकासाचं राजकारण केलं आहे. त्यामुळे त्यांनी ग्रामीण भागात लोकांनी मोठी पसंती दिली आहे. टिकाकार फक्त टिका करत राहिले आणि आम्ही विकासाचं राजकारण केलं असं भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…महाराष्ट्रात ‘भारत राष्ट्र समिती’ पक्षाची एंट्री, ‘या’ ग्रामपंचायतींवर बीआरएसने रोवला झेंडा
दरम्यान, राज्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये जवळपास ७० टक्के जागा भाजपने जिंकल्या आहेत. त्यामुळे लोकांना टिका नव्हे तर विकासाचं राजकारण आवडू लागलं असं म्हणत नाचता येईना अंगण वाकडे ही काॅंग्रेसची अवस्था झाली असल्याची टिका देखील प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजप आमदार नमिता मुंदडा यांना मोठा धक्का..! जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अजित पवारांच्या ताब्यात
हेही वाचा…नाशकात अजितदादांची दादागिरी, भुजबळांनीही आपला गड राखला
हेही वाचा…कोल्हापूरकरांनी सतेज पाटील अन् धनंजय महाडिकांना नाकारलं, अपक्ष उमेदवाराने मारली बाजी
हेही वाचा…कोल्हापूरकरांनी सतेज पाटील अन् धनंजय महाडिकांना नाकारलं, अपक्ष उमेदवाराने मारली बाजी
हेही वाचा…मोठी बातमी…! लोकसभेनंतर लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजणार ?