कोल्हापूर : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल हाती लागला असून आज जाहिर झालेल्या निकालामध्ये ठाकरे गटाचा पहिला सरपंच झाला आहे. कोल्हापुर जिल्ह्यातील ७४ ग्रामपंचायती आणि अकरा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल हाती लागला आहे. तर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कोल्हापुरकरांनी सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांना नाकारलं आहे.
हेही वाचा…“सचिन वाझे मातोश्री आणि वर्षावर का जायचे? भाजपच्या मंत्र्याने राऊतांना विचारला खोचक सवाल
कोल्हापुरच्या चिंचवाड ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवार श्रद्धा पोतदार सरपंच झाल्या आहेत. याठिकाणी काॅंग्रेसचे नेते सतेज पाटील आणि भाजपचे नेते धनंजय महाडिक यांनी आपापला उमेदवार दिला होता. परंतु जनतेने अपक्ष उमेदवार श्रद्धा पोतदार यांना निवडून दिलं आहे.
हेही वाचा…“अजित दादांच्या दबावामुळेच कार्यक्रमाचं निमंत्रण रद्द, मीरा बोरवणकरांचा गंभीर आरोप”
दरम्यान, करवीर तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत शिंदे गटाकडे गेली आहे. तर धोंडेवाडीची ग्रामपंचायतही शिंदे गटाच्या ताब्यात आली आहे. करवीर तालुक्याची पहिलीच ग्रामपंचायत शिंदे गटाकडे गेल्याने कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे. यातच जठारवाडी ग्रामपंचायत स्थानिक आघाडीच्या ताब्यात गेल्याने मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का बसलाय. तर याठिकाणी अजित पवार गट पिछाडीवर गेलाय.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी…! लोकसभेनंतर लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजणार ?
हेही वाचा…ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ‘या’ मंत्र्यांनी केला प्रचार, परंतु उमेदवाराचा झाला दारून पराभव
हेही वाचा…महाराष्ट्रात ‘भारत राष्ट्र समिती’ पक्षाची एंट्री, ‘या’ ग्रामपंचायतींवर बीआरएसने रोवला झेंडा
हेही वाचा…नगरमध्ये विखे पाटील अन् बाळासाहेब थोरातांची प्रतिष्ठापणाला, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल
हेही वाचा…रोहित पवारांना जोरदार धक्का, कर्जत मतदारसंघातील ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा