मुंबई : बीग बॉस विजेता एल्विश यादववर रेव्ह पार्टी आणि इतर गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. यानंतर एल्विश यादव आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वर्षा बंगल्यावरील फोटो व्हायरल होत आहे. यावरून संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली. त्यावर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राऊतांवर पलटवार केला आहे.
हेही वाचा…“अजित दादांच्या दबावामुळेच कार्यक्रमाचं निमंत्रण रद्द, मीरा बोरवणकरांचा गंभीर आरोप”
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, वर्षा बंगल्यावर येणाऱ्या प्रत्येक माणसाची माहिती नसते. आमदार, खासदार मंत्री यांच्यासोबत अनेक लोक येतात, जातात त्याचं एव्हढं भांडवल करण्याची काही गरज नाही. सचिन वाझे मातोश्री आणि वर्षावर का जायचे? याचा खुलासा संजय राऊतांनी करावा. असा टोलाही विखे पाटलांनी राऊतांना लगावला. पुढे बोलतांना ते म्हणाले की, सचिन वाझेंच्या खंडणी प्रकरणावर संजय राऊत गप्प का आहेत ? एल्विश यादव दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई होईल. असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“काहीच देणं घेणं नसल्यासारखं आपण मात्र बद्रीनाथच्या दर्शनाला निघून जायचं”, शिंदे गटाची ठाकरेंवर टिका
दरम्यान, गणेश उत्सवात मुख्यमंत्र्यांकडे वेगवेगळे सेलिब्रिटी येत असतात. त्यावेळेस एल्विश यादव रियालीटी शो जिंकला होता. त्यावेळी तो एक सेलिब्रिटी होता. असे अनेक सेलिब्रिटी येऊन जातात. ज्या वेळेस आला तेव्हा त्याच्यावर कुठला आरोप नव्हता. त्यामुळे आता त्याच्यावर आरोप आहे. मात्र असेच जर असेल तर कुठल्या नेत्यांकडे कोण कोण गेले होते ते बाहेर काढले तर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांची नावे समारे येतील असा इशारा फडणवीसांनी दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“कधीही आवाज द्या, तुमच्यासोबत,” प्रकाश सोळंकेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट
हेही वाचा…“जरांगे पाटलांना दवाखान्यातून सुट्टी देऊ नका, संभाजी राजेंनी डॉक्टरांना दिल्या सूचना”
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ खासदाराच्या गाडीचा मोठा अपघात, चारचाकी गाडीचा झाला चक्काचूर
हेही वाचा…अंबानींनकडून ४०० कोटींची खंडणी मागणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, तेलंगणातून केली अटक
हेही वाचा…“कुठल्या नेत्यांकडे कोण कोण गेले होते ते सर्व बाहेर काढेन ?” फडणवीसांनी कुणाला दिला इशारा ?