बीड : मी किंवा माझ्या पक्षाने कधीही मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही. आमच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं पाहिजे, या मागणीवर सगळ्या नेत्यांनी होकार दर्शवला आहे. ओबीसीमध्ये छोट्या छोट्या जाती आहेत. त्यात मराठ्यांना काही मिळणार नाही. आमची भूमिका तीच शिंदे, फडणवीस आणि शरद पवारांची आहे. असं म्हणत राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
हेही वाचा…कोल्हापूरकरांनी सतेज पाटील अन् धनंजय महाडिकांना नाकारलं, अपक्ष उमेदवाराने मारली बाजी
मराठा आंदोलन सुरू झालं त्यात प्रचंड नासधूस केली. सुभाष राऊत यांच्या हॉटेलमध्ये सर्वात जास्त नुकसान झालंय. आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावरील हल्ल्यानंतर त्यावेळी त्यांनी हॉटेलला सरंक्षण द्यायला सांगितले. सोळंके यांच्या घरातील हल्ल्यावेळी कोयते, पेट्रोल बॉम्ब सोबत होते. जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर यांच्या घरातील हल्ल्यात घरचे सापडले असते तर वाचले नसते. प्रत्येकाला सांकेतिक नंबर दिला होता. असा आरोपही छगन भुजबळांनी लावला आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! लोकसभेनंतर लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजणार ?
दरम्यान, एखादी सभा झाली, त्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्यांना शासनाने मदत दिली. आता आंदोलनामध्ये ज्यांची जाळपोळ झाली त्यांना देखील सरकारने भरघोस मदत दिली पाहिजे. ओबीसींची मत तुम्हाला हवी आहेत. मग त्यांच्यावर अन्याय का करीत आहेत ? असा सवाल देखील छगन भुजबळांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…छगन भुजबळ यांचा मोठा एल्गार, १७ नोव्हेंबरला ओबीसींचा महामोर्चा, सरकारच्या विरोधात आक्रमक
हेही वाचा…भाजपने तब्बल २०७४ पैकी ६६९ ग्रामपंचायतींवर झेंडा रोवला, मुंबईत मोठा जल्लोष
हेही वाचा…भाजप आमदार नमिता मुंदडा यांना मोठा धक्का..! जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अजित पवारांच्या ताब्यात
हेही वाचा…नाशकात अजितदादांची दादागिरी, भुजबळांनीही आपला गड राखला
हेही वाचा…कोल्हापूरकरांनी सतेज पाटील अन् धनंजय महाडिकांना नाकारलं, अपक्ष उमेदवाराने मारली बाजी