मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनात भाजपाची संपूर्ण देशात यशस्वी घौडदौड सुरू आहे. ‘पंचायत टू पार्लमेंट’ केवळ आणि केवळ आणि चप्पा-चप्पा भाजपा आहे. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत 750 हून अधिक जागा जिंकत भाजपाने राज्यात क्रमांक एकचे स्थान पटकाविले असल्याचं भाजपने म्हटलं आहे.
हेही वाचा…“आंदोलनामध्ये कुटुंबीय सापडले असते तर वाचलेच नसते,” छगन भुजबळांचं मोठं विधान
राज्यातील महायुती सरकारच्या कामगिरीला सुद्धा हा राज्यातील जनतेने दिलेला सुस्पष्ट कौल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा मोठे यश या निवडणुकीत मिळाले. राज्यातील महायुतीने एकत्रितरित्या 1400 हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये दणदणीत विजय संपादन केला असल्याचा दावाही भाजपने केला आहे.
हेही वाचा…छगन भुजबळ यांचा मोठा एल्गार, १७ नोव्हेंबरला ओबीसींचा महामोर्चा, सरकारच्या विरोधात आक्रमक
दरम्यान, राज्यातील जनतेवर त्यांच्या सरकारच्या काळात अतोनात सूड उगविणार्या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची बेरीज केली तरी त्याच्या दुप्पट यश एकट्या भाजपाला मिळाले आहे. महाराष्ट्रातील जनतेने आपला कौल दिला आणि तोही सुस्पष्ट दिला, त्यांचे खूप खूप आभार ! या विजयासाठी अहोरात्र परिश्रम करणार्या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. सतत प्रवास करणारे आणि कार्यकर्त्यांना प्रेरित करणारे आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही अभिनंदन ! ठिकठिकाणचे खासदार, आमदार, पदाधिकारी यांचेही अभिनंदन. असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ग्रामपंचायती निवडणुकीत ठाकरेंना मिळाल्या कमी जागा, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
हेही वाचा…‘या’ तालुक्यात भाजपला एकही जागा जिंकता आली नाही, सगळ्या पक्षांना धक्का देत अपक्षांनी मारली बाजी
हेही वाचा…“तुम्ही तर आमचा जीव घ्यायला निघालेत”? मनोज जरांगे पाटलांचं भुजबळांना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“मावळचा खरा सरदार कोण ?” ग्रामपंचायत निकालावरून भाजप अन् राष्ट्रवादीमध्ये जोरदार खडाजंगी
हेही वाचा…भुजबळांचे मनोज जरांगे पाटलांवर तिखट वार, तर सरकारवर केला हल्लाबोल, राजकारण तापलं..!