मुंबई : राज्यात महामारी, ऑक्सिजन-लस-रेमेडीसीवर यांची कमतरता, मराठा आरक्षण, तौक्ते चक्रीवादळाने झालेले कोकण किनारपट्टीचे नुकसान, परमबीर सिंग आणि अनिल देशमुख, सचिन वाझे यांच्या वेगवेगळ्या संस्थांकडून सुरु असलेल्या चौकश्या यांवरून वातावरण तापलेले असतानाच, आता राज्यात अजून एका नवीन वादाला तोंड फुटले आहे.
या वेळी वादाच्या भोवऱ्यात कोणत्याही पक्षाचा मंत्री सापडलेला नसून, पत्रकार गिरिश कुबेर यांनी लिहिलेले, ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ हे पुस्तक आहे. या पुस्तकातील छ. संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह अशा लिखाणावरून राज्यात नवीन वाद सुरु झाला असून, ‘रेनिसन्स स्टेट’ या पुस्तकातील वर उल्लेखलेल्या ठराविक तपशीलाबाबत ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राचे संपादक गिरीश कुबेर यांनी देशाची माफी मागावी, तसेच राज्य सरकारने तातडीने या पुस्तकावर बंदी आणावी, अशी मागणी आता अनेक संघटनांकडून आणि राजकीय पक्षाकडून होऊ लागली आहे.
तसेच, या पुस्तकातला हा ठराविक आक्षेपार्ह मजकूर छापून, लेखक गिरीश कुबेर हे नेमकं काय साध्य करू इच्छितात आणि त्यांना नक्की काय दर्शवायचं आहे?, असा सवाल आता राज्यभरातून अनेक जण उपस्थित करत आहेत. दरम्यान, ज्या पुस्तकावरून हा नवा वादंग सुरु झाला आहे आणि त्यातल्या ज्या मजकुरावर अनेकांनी आक्षेप दर्शवला आहे, त्याच्या स्पष्टीकरणार्थ या पुस्तकाचे लेखक गिरिश कुबेर अजूनही समोर आलेले नाही आहेत.
Read Also :
- रेडझोनमधील १४ जिल्हे वगळून, एक जूननंतर लाॅकडाऊन ४ टप्प्यांमध्ये शिथिल करण्याची शक्यता
- ‘काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनाच काँग्रेसशिवाय सरकार असल्याची शंका का यावी?’
- “नाना पटोले जे म्हणाले ते…” राष्ट्रवादीकडून दिली गेली पटोलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
- सरकार काँग्रेसच्या बळावर म्हणता, पण सत्तेत काँग्रेसला किंमत किती?
- “आमच्याकडे प्रस्तावच आला नाही, फाईलच सापडत नाही”, ही राज्यपालांची उत्तरं हास्यास्पद