मुंबई : राज्यातील महामारीच्या बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सुरुवातीला १५ दिवस कडक निर्बंध लागू केले. मात्र, रुग्णसंख्येत सातत्याने होत असलेली वाढ पाहून, लॉकडाऊन मध्ये देखील हळूहळू राज्य सरकारकडून वाढ करण्यात आली आणि सध्या राज्यात १ जूनपर्यंत कडक निर्बंधांसह लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
दरम्यान, १ जूननंतरही राज्यातील लॉकडाऊन पुढे वाढवला जाणार का? हा प्रश्न नागरिकांच्या मनात येत होता. आता या अनुषंगाने मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एक महत्त्वाचं विधान केलं असून, ‘राज्यातील १४ जिल्हे सध्या रेड झोनमध्ये आहेत. या जिल्ह्यांत कडक लॉकडाऊन, तर रेड झोन वगळून इतर जिल्ह्यांमध्ये १ जून नंतर लाॅकडाऊन मध्ये शक्य झाल्यास शिथिलता देण्यात येईल. येत्या ४ दिवसात याबाबत निर्णय घेतला जाईल.
तसेच, रेड झोनमधील जिल्ह्यात बाधित रुग्णसंख्या कमी झाली नाही, तर त्या जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन कायम राहणार, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. मात्र, याबाबत अजूनही साशंकता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बुलढाणा, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश रेड झोन मध्ये आहे.
दुसरीकडॆ, राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा बऱ्याच प्रमाणात सकारात्मक परिणाम दिसून येत असून, त्यामुळे राज्यातील बाधित सक्रिय रुग्णांमध्ये घट होत आहे. तसेच, महामारीने बाधित रुग्णांचा आकडा देखील मोठ्या प्रमाणात आहे. मात्र जुलै आणि ऑगस्टमध्ये तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असल्याने आणि त्यातही लहान वयोगटातील मुला-मुलींना या लाटेत बाधित होण्याचा अधिक धोका असल्याने, त्या दृष्टीने राज्य सरकार पाऊल उचलत आहे.
Read Also :
- ‘राऊतांच्या टीकेला काय उत्तर द्यायचं? त्यांची टीका म्हणजे निव्वळ पोरखेळ’
- “नाना पटोले जे म्हणाले ते…” राष्ट्रवादीकडून दिली गेली पटोलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
- सरकार काँग्रेसच्या बळावर म्हणता, पण सत्तेत काँग्रेसला किंमत किती?
- “आमच्याकडे प्रस्तावच आला नाही, फाईलच सापडत नाही”, ही राज्यपालांची उत्तरं हास्यास्पद
- आदित्य ठाकरे हरवले; शोधुन देणाऱ्याला लस फुकट मिळणार