म्हापसा : गोवा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आता जोमाने मैदानात उतरले असून कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यातच म्हापसा मतदारसंघ हा उमेदवारांची भाऊगर्दी झाल्याने चांगलाच चर्चेत आला आहे. म्हापसा मतदारसंघात वैश्य समाजाबरोबर भंडारी तसेच खिश्चन समाजातील मते निर्णायक ठरणार आहेत. यापैकी ख्रिश्चन समाज हा सध्या तरी भाजपच्या पाठीशी असल्याचे दिसून आले आहे. या तिन्ही समाजाची मिळून ६० टक्क्यांहून जास्त मते या मतदारसंघात असून नवा आमदार कोण असणार हे हेच मतदार ठरवणार आहेत असे चित्र आहे.
नाना पटोलेंच्या फोटोला भाजपने पाजलं गोमूत्र; प्रसाद लाड म्हणतात… नानांच शुद्धीकरण करणं गरजेचं…
गेली दोन दशके भाजपाला प्रतिनिधीत्व करण्याची संधी देणाऱ्या या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाला अद्यापही प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळालेली नाही.या मतदार संघातून किमान पाच उमेदवार रिंगणातून दिसणार आहेत. यात भाजपा बरोबर काँग्रेस तसेच आम आदमी पार्टी हे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून दिसणार आहेत. तसेच शिवसेना, तृणमूल काँग्रेसचा उमेदवारही रिंगणात असणार आहे. भाजपने या मतदार संघातून दिवंगत मंत्री फ्रान्सिस डिसुझा यांचे सुपुत्र जोशुआ डिसुझा यांना मैदानात उतरवले आहे.तर दुसऱ्या बाजूला या मतदारसंघात यंदा कॉंग्रेसकडून सुधीर कांदोळकर यांना मैदानात उतरवले आहे.
शरद पवारांना कोरोनाची लागण: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लगेच फोन, केली तबेतीची विचारपूस
कांदोळकर हे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते मायकल लोबो यांच्या छत्रछायेत निवडणूक लढवत असल्याचे दिसून येत आहे. लोबो यांची प्रतिमा ही फारशी चांगली नसल्याने या मतदार संघातील वैश्य समाज हा कांदोळकर यांच्या पाठीशी उभा राहणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती असल्याचे चित्र भाजप उभा करत असतानाच लोबोंनी गोव्यातील भंडारी समाजाला संपवण्याची सुपारी दिली असा तृणमूल काँग्रेसचे नेते किरण कांदोळकर यांनी आरोप केल्याने लोबो आणि सुधीर कांदोळकर यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. कांदोळकर हे लोबो यांच्या हातातील कठपुतळी असल्याची चर्चा असल्याने कांदोळकर यांची देखील प्रतिमा आता डागाळू लागली आहे.
इतिहास काय सांगतो ?
श्यामसुंदर नेवगी १९८० काँग्रेस अर्सच्या उमेदवारीवर निवडून आले होते. त्यानंतर १९९९ साली राजीव काँग्रेसच्या उमेदवारीवर फ्रान्सिस डिसोझा (बाबूश) स्वत: निवडून आले होते. त्यामुळे काँग्रेसला एकदाही या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी लाभली नाही. १९९९ च्या विजयानंतर बाबूशने भाजपात प्रवेश केला होता. तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे.
Read also:
- उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे कोल्हापुरात काँग्रेसच टेन्शन वाढलं; राजेश क्षीरसागरांना मात्र मिळालं नवं बळ
- निवडणूक प्रचारासाठी कोविड महामारीचे भाडंवल करू नका; जोशुआ डिसोझा यांचे आवाहन
- भाजप- शिवसेनेत जुंपली; राऊतांच्या ट्विटवर पुनम महाजन म्हणतात… नामर्दासारखे कार्टुन…
- औरंगाबादमध्ये आले तर नाना पटोलेंना कपडे फाटेपर्यंत मारू; शहर भाजपचा पटोलेंना सज्जड दम
- नवख्या जोशुआने कोरोना काळात केलेल्या कामांचं म्हापसेकरांकडून तोंडभरून कौतुक !