कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. त्या जागी आता लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांचे नाव निश्चित केले आहे. त्यानुसार त्यांनी तयारीला सुरुवात देखील केली आहे.
“इतकं बेशिस्त आणि भ्रष्ट सरकार महाराष्ट्राने कधीच अनुभवलं नाही”; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
काँग्रेस पक्ष ही जागा बिनविरोध करण्यासाठी आग्रही आहे. दुसरीकडे कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेना देखील आता मैदानात उतरत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संबोधित करत असताना सर्व निवडणुका लढविण्याचा संदेश दिला. ठाकरे यांच्या या नव्या भूमिकेमुळे उत्तरमधून लढण्याच्या माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मागणीला पाठबळ मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोल्हापुरातील शिवसैनिकांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही जागा बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
नाना पटोलेंच्या फोटोला भाजपने पाजलं गोमूत्र; प्रसाद लाड म्हणतात… नानांच शुद्धीकरण करणं गरजेचं…
कोल्हापूर उत्तर जागेचा इतिहास पाहिल्यास शिवसेनेने कायमचं हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवलेला आहे. १९९०, १९९५, १९९९ या तिन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेने हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला. २००४मध्ये मात्र शिवसेनेला पराभवाचा झटका बसला होता. २००९, २०१४ मध्ये मात्र राजेश शिरसागरांनी पुन्हा एकदा मतदारसंघावर ताबा मिळवला. त्यानंतर मागच्या वेळी काँग्रेसचे चंद्रकांत जाधव यांच्याकडून शिवसेनेला पराभव चाखावा लागला. मात्र आता पुन्हा शिवसेनेने कोल्हापूर उत्तरमध्ये वातावरण तयार केले आहे. आता काँग्रेस काय भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read also:
- निवडणूक प्रचारासाठी कोविड महामारीचे भाडंवल करू नका; जोशुआ डिसोझा यांचे आवाहन
- भाजप- शिवसेनेत जुंपली; राऊतांच्या ट्विटवर पुनम महाजन म्हणतात… नामर्दासारखे कार्टुन…
- औरंगाबादमध्ये आले तर नाना पटोलेंना कपडे फाटेपर्यंत मारू; शहर भाजपचा पटोलेंना सज्जड दम
- नवख्या जोशुआने कोरोना काळात केलेल्या कामांचं म्हापसेकरांकडून तोंडभरून कौतुक !
- शरद पवारांना कोरोनाची लागण: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लगेच फोन, केली तबेतीची विचारपूस