कोल्हापूर : उत्तरेचे विधानसभेचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनाने कोल्हापूर उत्तरेत पोटनिवडणूक होऊ घातली आहे. भाजपकडून माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे भाचे सत्यजित कदम हे मैदानात उतरले आहेत तर पालकमंत्री बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसकडून जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मग हिजाब, बुरखा घालणाऱ्या राज्यात मुलीला पाठवणार का? जितेंद्र आव्हांना सदाभाऊ खोतांचा सवाल
शिवसेना कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या बाबतीत कमालीची नाराज होती असं काहीसं चित्र सुरुवातीच्या काळात पाहायला मिळालं होतं. शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर हे याठिकाणी आमदार म्हणून दोन वेळेस निवडून आले होते आणि हा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने ते काँग्रेसला देण्यासाठी तितके इच्छुक नव्हते.
‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचा ‘मनसे’ विशेष शो दाखवला जाणार; मनसे ‘ते’ ट्विट चर्चेत
दोन ते तीन दिवस ते नॉट रिचेबल झाल्याने काँग्रेसच्या चिंतेत भर पडली होती. मात्र दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश मिळाल्यानंतर राजेश क्षीरसागरांचे बंड शांत झाले आणि ते लागलीच आता जयश्री जाधव यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. जयश्री जाधव यांच्या अर्ज भरण्याच्या कार्यक्रमावेळी देखील राजेश क्षीरसागर यांनी जोरदार भाषणबाजी करून भाजपवर टीका केली आहे. चंद्रकांत पाटलांवर टीका करताना क्षीरसागर म्हणाले की आम्ही कधीही पाठीवर वार करत नाही. जे काही असेल ते समोरून करण्याची आमची पद्धत आहे. शत्रूला अंगावर घेऊन समोरून वार करुन हरविण्याची आमची मर्दाची जात आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार आम्हाला कोल्हापूर उत्तरेत काँग्रेसचा झेंडा फडकवायचा आहे आणि जयश्री जाधव यांच्या विजयासाठी शिवसैनिक जीवाचे रान करतील असा शब्दही क्षीरसागरांनी बैठकीत दिला आहे. आता कोल्हापूर उत्तरेत कोणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Read also:
- “५० वर्षातील कामाचा हिशोब बिंदू चौकात काँग्रेसने द्यावा”; चंद्रकांत पाटलांचा बंटी पाटलांना टोला
- नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरेंचे संबंध काय? किरीट सोमय्यांचा नवा खुलासा
- “शेंडी जानव्याचे राजकारण नको”; विनायक राऊतांच्या वक्तव्यांवरून ब्राम्हण समाज आक्रमक
- माझ्या मुलीचा राजकारणाशी संबंध काय? तर ती आत्महत्या करेल; जितेंद्र आव्हाडांचं धक्कादायक वक्तव्य
- रूपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा; राज्यात एकच चर्चा