खेड : नाशिक पुणे महामार्गावरील खेड तालुक्यात बऱ्याच वर्षापासून लोकांना वाहतुक कोंडीचा सामाना करावा लागत आहे. ही वाहतुक कोंडी दुर व्हावी, यासाठी आतापर्यंत अनेक लोकांनी याबाबत राजकीय नेत्यांना निवेदने देण्यात आलीत. परंतु वाहतुक कोंडीचा प्रश्न काही सुटला नाही. त्याचा त्रास आताही तेथील लोकांना मोठ्या प्रमाणात होत असून याविरोधात आता खेड तालुक्यातील वाहतुक कोंडी कृती समितीने आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. त्यामुळे आज 15 डिंसेबर रोजी सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन करण्यात आला. यावेळी आंदोलन कर्त्यांनी या भागातील रस्त्यावर उड्डाणपुल व्हावं अशा अनेक मागण्यांसह जोरदार घोषणाबाजी दिली.
“जिकडे सत्ता तिकडे पुढेच बच्चू कडू चिपळ्या वाजवयाला पुढे असतात”; राऊतांचं बच्चू कडूंना प्रत्युत्तर
भारतामधील सर्वात मोठी समजली जाणारी चाकण एमआयडीसीचा आज पाचवा टप्पा जाहीर झाला आहे. परंतु या चाकण एमआयडीसाला जोडणारा पुणे-शिक्रापुर, नाशिक-पुणे, आणि म्हाळुंग्यावरून तळेगाव येणाऱ्या रस्त्याची दुव्यवस्था अत्यंत दयनीय परिस्थिती आपण पाहत आलो आहे. याकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष आपल्याला सगळ्यांना बघायला मिळत आहे. यासाठी कृती समिती, संघटना, कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे निवेदने दिलीत. पंरतु पंधरा वर्षापासून या निवेदनाचा कुठल्याही प्रशासनाने, कुठल्याही सरकारने विचार केला नाही. त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र यावं लागतं. त्यासाठी कृती समिती स्थापन करावी लागते. ही खुप मोठी शोकांतिका आहे. यासाठी मी आवाहन करतो की, सर्व प्रकाराचे मतभेद बाजूला ठेऊन खेड कृती समितीत एकत्रित काम करून या आंदोलनाला एक वेगळी दिशा द्यायची आहे. असं खेड आळंदी विधानसभा मतदार संघातील आप आदमी पार्टी, आप युवा आघाडीचे अध्यक्ष मयुर दौंडकर यांनी सांगितले.
“निव्वळ फेसबुकवर पोकळ गप्पा मारून चालत नाही, त्यासाठी..;” बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेेंना टोला
खेड तालुक्यात बऱ्याच वर्षापासून वाहतुक कोंडीचा येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी आज खेड तालुक्यात सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला होता. यावेळी खेड तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी, लोकांनी सहभाग घेऊन शासन, प्रशासन यांना यावर तातडीने अंमलबजावणी झाली नाही तर यापेक्षा मोठा आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी आंदोलन कर्त्यांनी ठिकठिकाणी उड्डाणपुल बांधावे, ट्राफिक पोलिसांची संख्या प्रत्येक चौकात वाढवावी, तसेच इतर मागण्या करण्यात आल्या. तसेच शासन आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाही आंदोलन कर्त्यांनी दिल्या.
Read also
- “आमचा मोर्चा कोणतंही सरकार थांबवू शकणार नाही,” संजय राऊत असे का म्हणाले ?
- “संत परंपरेच्या अपमानासाठी सुषमाताईंच्या नेतृत्वात नवी सेना उघडलेय का ?” भाजपचा सवाल
- “हे चित्र पाहून कर्नाटक पुढे महाराष्ट्र लाचार, असे चित्र उभे करण्याचा हा भाजपचा डाव”
- “सुषमाताई, बाळासाहेबांची आता नाक घासून माफी कधी मागणार”; मनसेची आक्रमक भूमिका
- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर अखेर गृहमंत्र्यांनी तोडगा काढला, म्हणाले…;