मुंबई : महाराष्ट्रात सातत्याने होत असलेल्या महापुरूषांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात राज्यातील विरोधी पक्षांनी येत्या 17 डिसेंबरला मुंबईत महामोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. परंतु या मोर्चाला अजूनपर्यंत परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच यासंदर्भात अनेक नेत्यांना पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून नोटीसाही पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
“निव्वळ फेसबुकवर पोकळ गप्पा मारून चालत नाही, त्यासाठी..;” बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेेंना टोला
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरूषांचा अपमान सत्तेवर बसणारे मंत्री खुलेआम करीत आहेत. अन् त्याचं समर्थन सरकार करीत आहे. त्याच्याविरोधात आम्ही मोर्चा काढू नये का? असा सवाल करत जर आम्ही मोर्चा काढू नये म्हणून तुम्ही राज्यपाल, भाजपच्या प्रवक्तेवर कारवाई का केली नाही. ? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
शाईफेक प्रकरणी अटकेत असलेल्या तिघांनाही जामीन मंजूर.. हार घालत समर्थकांचा मोठा जल्लोष
काल महाराष्ट्र-कर्नाटकचे मुख्यमंत्री एकमेकांना भेटले असले तरी सीमाभागावर तणावाची परिस्थिती आहे. आम्ही टोकाची भूमिका काही घेणार नाही. पण सीमावादावर आम्ही गप्प बसणार नाही. अशा अनेक प्रश्नांवर मोर्चा काढून महाराष्ट्राचा आवाज केंद्र पर्यंत पोहचवू. हा जनेतचा मोर्चा असून मला पुर्णपणे खात्री आहे की, या आमच्या मोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही. असा इशाराही संजय राऊतांनी म्हटलं आहे.
“नकळत काही चुकीचं बोललं असेल तर..”; सुषमा अंधारेंनी मागितली हात जोडून माफी
दरम्यान, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि अपमानाचा प्रश्न असल्याने या मोर्चात अनेक लोक सहभागी होणार आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. परंतु महाराष्ट्रातील जनता अजून जागी आहेत. त्यामुळे जनता आपला आवाज मोठा करेल आणि दिल्लीच्या तख्त्यापर्यंत जनतेचा आवाज जाईल, अशी शक्यताही राऊतांनी यावेळी व्यक्त केली आहे.
Read also
- “संत परंपरेच्या अपमानासाठी सुषमाताईंच्या नेतृत्वात नवी सेना उघडलेय का ?” भाजपचा सवाल
- “हे चित्र पाहून कर्नाटक पुढे महाराष्ट्र लाचार, असे चित्र उभे करण्याचा हा भाजपचा डाव”
- “सुषमाताई, बाळासाहेबांची आता नाक घासून माफी कधी मागणार”; मनसेची आक्रमक भूमिका
- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर अखेर गृहमंत्र्यांनी तोडगा काढला, म्हणाले…;
- “जिकडे सत्ता तिकडे पुढेच बच्चू कडू चिपळ्या वाजवयाला पुढे असतात”; राऊतांचं बच्चू कडूंना प्रत्युत्तर