पुणे: महाराष्ट्रातल्या ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत. या अकरा जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे. पुण्यातले निर्बंध शिथील व्हावेत यासाठी तिथले दुकानदार आणि व्यावसायिकही आक्रमक झाले आहेत. सध्याच्या घडीला पुण्यात लेव्हल थ्रीचे निर्बंध आहेत. त्यानुसार दुकानं ४ वाजेपर्यंत उघडी ठेवण्याची मुभा आहे. ही मुदत रात्री आठ वाजेपर्यंत वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे. याच संदर्भात मुरलीधर मोहोळ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिलं आहे.
हे पण वाचा: कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी, नियमांचे कठोर पालन करावेच लागेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पुण्यातल्या दुकानं ही रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात यावीत ही प्रमुख मागणी या पत्रात करण्यात आली आहे. एवढंच नाही तर पुण्यातल्या निर्बंधांमध्ये शिथीलता मिळावी अशीही मागणी करण्यात आली आहे. पुण्यात जे निर्बंध लागू आहेत ते लेव्हल थ्रीचे निर्बंध आहेत. इतर २५ जिल्ह्यांमध्ये लेव्हल वनचे निर्बंध आहेत. पुण्यातल्या निर्बंधांच्या विरोधात पुण्यात मागच्या तीन दिवसांपासून व्यापारी महासंघाकडून रात्री आठपर्यंत दुकानं सुरू ठेवून निषेध व्यक करण्यात येतो आहे. पुणेकरांना लवकरच दिलासा मिळेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. मात्र पुण्यातले निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पुणेकर व्यावसायिक नाराज झाले आहेत.
हे पण वाचा: पुण्यातील कोरोना निर्बंधांवरून राज्य सरकार आणि पुणे महापौर पुन्हा एकदा आमनेसामने
महाराष्ट्र सरकारला गणपती बाप्पाने सुबुद्धी द्यावी यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते महाआरती करून साकडं घालण्यात आलं. त्यानंतर लक्ष्मीरोडवर मोर्चाही काढण्यात आला होता. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रात निर्बंध शिथील करा आणि पुणेकरांना न्याय द्या अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीला राजेश टोपे काय प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Read Also :
- मनसेच्या गोटात हालचालींना वेग; नाशिक -पुणेनंतर राज ठाकरे आता मराठवाडा दौऱ्यावर
- मोठी बातमी: देशात ओबीसींना वगळून निवडणुका होणे अशक्य – विजय वडेट्टीवार
- ‘तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही काही बोललो का?’, राऊतांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर
- साहेब तुम्ही, पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा, अशीही जनतेची मागणी, राष्ट्रवादीचा मोदींना टोला
- राष्ट्रीय ओबीसी महासंघांचं नागपुरात अधिवेशन, आज ठरणार ओबीसींच्या पुढील लढ्याची दिशा