पुणे: राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात आले असून यापुढे याचे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नाव असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव दिले जावे, यासाठी देशभरातून लोकांच्या विनंत्या येत होत्या. त्यामुळे देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार त्यांच्या नावे देणे योग्य असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांनी मोदींना टोला लगावला आहे.
हे पण वाचा: राज्यातील कलाकारांना मोठा दिलासा: प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार
जनतेची मागणी होती म्हणून नरेंद्र मोदींनी खेलरत्न पुरस्कारांचं नाव बदलले, हे चांगल आहे पण जनतेच्या अजूनही काही छोट्या छोट्या मागण्या आहेत. महागाई कमी करा, युवकांना रोजगार द्या, महिलांना सुरक्षा द्या, शेतकऱ्यांना सन्मान द्या आणि राजीनामा द्या, असे ट्विट रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
"जनतेची मागणी" म्हणून खेलरत्न पुरस्कारांचं नाव बदललं म्हणे… चांगलं आहे.
जनतेच्या अजूनही काही छोट्या छोट्या मागण्या आहेत
१- महागाई कमी करा
२- युवकांना रोजगार द्या
३- महिलांना सुरक्षा द्या
४- शेतकऱ्यांना सन्मान द्या
५- राजीनामा द्या— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) August 6, 2021
हे पण वाचा: कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी, नियमांचे कठोर पालन करावेच लागेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आधीच्या सरकारने केलेल्या कामांची नावे फक्त राजकीय द्वेषातून बदलून त्याचे श्रेय लाटण्याची या सरकारची जुनी खोड आहे. तापलेल्या तव्यावर स्वतःची चपाती भाजण्याची सवय भाजपाने आता तरी बदलायला हवी. जनतेच्या आणखीही बऱ्याच मागण्या आहेत त्याकडे देखील प्रधान ‘सेवकांनी’ लक्ष द्यावे, अशी टीका चाकणकर यांनी केली आहे.
हे पण वाचा: भाजपच्या ३ बड्या नेत्यांची दिल्लीवारी, राज्याच्या नजरा लागल्या राजधानीकडे; राजकीय वर्तुळात चर्चा
मेजर ध्यानचंद नावानेही पुरस्कार
खेलरत्न पुरस्काराव्यतिरिक्त, क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी देशातील सर्वोच्च पुरस्कारामध्ये ध्यानचंद पुरस्कारदेखील आहे जो मेजर ध्यानचंद म्हणूनही ओळखला जातो. याची सुरुवात २००२ मध्ये झाली. २००२ मध्ये नवी दिल्लीतील राष्ट्रीय स्टेडियमचे नावही ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम असे ठेवण्यात आले आहे.
Read Also :
- राष्ट्रीय ओबीसी महासंघांचं नागपुरात अधिवेशन, आज ठरणार ओबीसींच्या पुढील लढ्याची दिशा
- मुंबई निवडणुकीसाठी काँग्रेसची मोठी घोषणा, सोनिया गांधी, राहुल गांधी २८ डिसेंबरला शिवाजी पार्कवर
- ‘आधी अधिकार नाही म्हणून ओरडायचे, आता अधिकार दिले तर काय फायदा म्हणतात!’, मेटेंची चव्हाणांवर टीका
- शरद पवार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट, महाराष्ट्राच्या पूरस्थितीवर चर्चा
- कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी, नियमांचे कठोर पालन करावेच लागेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे