मुंबई : राज्याच्या राजकारणात नेत्यांच्या दिल्लीवारीचा आणि बड्या नेत्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला अजूनही सुरुच आहे. एकीकडे संसदेचं अधिवेशन सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार इतर विरोधी पक्षनेत्यांच्या आणि भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत असतानाच, आता अजून एका गुलदस्त्यात असलेल्या भेटीची माहिती समोर आली आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.
राज्यातील कलाकारांना मोठा दिलासा: प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार
दरम्यान, या भेटीचा उलगडा झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील आज ४ दिवसांच्या दिल्ली’वारी’ वर गेले असून, सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा तातडीने दिल्लीला रवाना होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे भाजप नेत्यांची दिल्लीत काय खलबतं सुरु आहेत याची आता चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी अमित शहांची भेट घेतली होती. आज पाटील-ठाकरे यांची भेट झाली. यातच आशिष शेलार-अमित शहा यांची गुप्त भेट आणि चंद्रकांत पाटील-देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाण्याची माहिती आल्याने, महाराष्ट्राच्या नजरा दिल्लीकडे लागल्या आहेत. या भेटीत आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती ठरवली जाऊ शकते. तसेच, मनसे-भाजप युतीवरही चर्चा केली जाऊ शकते.
“सेनेची ताकदच दाखवायची असेल, तर मुंबई महापालिकेची निवडणूक लढवा” पाटलांचे राऊतांना आव्हान
त्यामुळे, सध्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर आणि देशातील राजकीय परिस्थितीवर दिल्लीत मोठी खलबतं सुरू असल्याचे दिसून येत असून, एकीकडे राज्यातील विरोधक भाजप सत्ताधारी महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारला यावेळी सर्व विरोधक मिळून कात्रीत पकडायचा प्रयत्न करत आहेत. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतील हे नक्की!
Read Also :
- “भेटीवर बंधन नाही, पण राजकारणात जर-तरला महत्त्व नसते”, पाटील-ठाकरे भेटीवर फडणवीसांचे विधान
- पुणे मेट्रो : भाजप-राष्ट्रवादीची श्रेयवादाची लढाई सुरुच, मेट्रोच्या कामाची उद्या फडणवीस करणार पाहणी
- पुण्यातील कोरोना निर्बंधांवरून राज्य सरकार आणि पुणे महापौर पुन्हा एकदा आमनेसामने
- ‘नॉट रिचेबल’ देशमुखांच्या नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजवर ईडीची छापेमारी
- मुंबई लोकलबद्दल पुढच्या दोन दिवसात निर्णय होणार; आदित्य ठाकरेंचे महत्वपुर्ण विधान