मुंबई : आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सकाळी ११:३० वा. ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यात तब्ब्ल सव्वा तास चर्चा झाली. त्यामुळे, या दोन दिग्गज नेत्यांच्यात काय घडले हे जाणून घेण्याची सगळ्यांचीच इच्छा होती. तसेच, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने मनसे-भाजपच्या युतीची चर्चाही जोराने सुरु होती.
भविष्यात भाजपा-मनसे युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटींनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान
दरम्यान, या भेटीवर आता नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर भाष्य केले आहे. “राज्यात भेटीवर बंधन नाही, पण जर-तरला राजकारणात महत्त्व नसते” असं म्हणत त्यांनी युतीच्या चर्चेचा रोख पुन्हा एकदा फिरवला आहे. त्यांच्या या सूचक प्रतिक्रियेवर आता पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत.
मोठी बातमी : राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं, आता “या” नावाने पुरस्कार
यावेळी त्यांनी, “राज ठाकरे आणि आमच्या पक्षात फक्त परप्रांतियांच्या भूमिकेला घेऊन फरक आहे. त्यांची ती भूमिका आम्हाला मान्य नाही. मात्र आमच्यात हिंदुत्वाचा मुद्दा समान आहे. भेटीबद्दल सांगायचं तर, चंद्रकांत दादांनी स्पष्ट केलं आहे. नाशिकला भेट झाली. तेव्हा राज ठाकरेंनी त्यांना निमंत्रण दिलं होतं. त्यांनी सीडीदेखील पाठवली होती. त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे. त्यात अन्य काही नाही”, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मनसे नेत्याची मोठी प्रतिक्रिया, “मनसे आणि भाजप एकत्र आले तर आनंदच!”
दुसरीकडे, भेटीनंतर पाटील यांनीही माध्यमांशी बोलताना, “बैठकीत युती बाबत कुठलीही चर्चा झाली नाही. पण राजकीय चर्चा झाली असं म्हणता येईल. आम्ही एकमेकांच्या भूमिकेांविषयी चर्चा केली. त्यांच्या परप्रातीयांद्दलच्या भूमिका मी समजून घेतल्या. कुणाच्याही २ भूमिका असतात, मला या भेटीत माणूस म्हणून त्यांच्या भूमिकांवर चर्चा करायची होती, तशी ती झाली”, असं सांगितलं. मात्र, या भेटीमुळे राज्यातलं राजकारण नक्कीच तापलं आहे, यात शंका नाही!
Read Also :
- मुंबई लोकलबद्दल पुढच्या दोन दिवसात निर्णय होणार; आदित्य ठाकरेंचे महत्वपुर्ण विधान
- राज्यातील कलाकारांना मोठा दिलासा: प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार
- “अहमदाबादच्या क्रिकेट स्टेडियमलाही खेळाडूंचेच नाव द्या”, नामकरणाच्या वादावरून काँग्रेसची आक्रमक मागणी
- “सेनेची ताकदच दाखवायची असेल, तर मुंबई महापालिकेची निवडणूक लढवा” पाटलांचे राऊतांना आव्हान
- मोठी बातमी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील ३ गाड्यांचा अपघात