मुंबई: राज्यांना अधिकार देऊन काही फायदा होणार नाही. तर आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा काढणं गरजेचं असल्याचं मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं. त्यावर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी अशोक चव्हाणांवर जोरदार हल्ला चढवला आहे. अशोक चव्हाण आधी अधिकार नाही म्हणून ओरडत होते. आता अधिकार दिले तर अधिकार देऊन काय उपयोग असं म्हणत आहेत, अशा शब्दात मेटे यांनी चव्हाणांना टोला लगावलाय.
हे पण वाचा: “सेनेची ताकदच दाखवायची असेल, तर मुंबई महापालिकेची निवडणूक लढवा” पाटलांचे राऊतांना आव्हान
१०२ व्या घटनादुरुस्तीमध्ये बदल करण्याचा निर्णय ऐतिहासिक आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. हा निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचेही आभार. आता मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रक्रिया तातडीने सुरु करावी, अशी मागणी विनायक मेटे यांनी राज्य सरकारकडे केलीय. राज्य मागासवर्ग आयोगाने केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे अहवाल द्यावा. सर्वोच्च न्यायालयाने जी प्रक्रिया सांगितलं आहे त्या प्रक्रियेनं जायला हवं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने बैठक घ्यावी, अशी मागणी मेटे यांनी केलीय.
हे पण वाचा: मनसे नेत्याची मोठी प्रतिक्रिया, “मनसे आणि भाजप एकत्र आले तर आनंदच!”
मराठा आरक्षणासाठीची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर राज्यातल्या मराठा समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली. यावरून सत्तेतील महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष असलेला भाजप एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आणि राज्यात पुन्हा एकदा मराठा क्रांती मूक मोर्चाची हाक देण्यात आली. यांनतर संभाजीराजेंनी राज्यव्यापी दौरा करत, काही मागण्या सरकारसमोर ठेवल्या आणि नंतर आंदोलनाचा इशारा दिला.
हे पण वाचा: मुंबईतील लोकल ट्रेनसाठी आंदोलन करणाऱ्या प्रवीण दरेकर यांच्यावर दंडाची कारवाई
दरम्यान, या सगळ्या घटनाक्रमाला कारणीभूत असलेल्या १०२ व्या घटनादुरुस्ती विधेयकात बदल केले जावेत, अशी मागणी सातत्याने केली जात होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता, केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, मराठा आरक्षणाच्या निकालानंतर केंद्र सरकारने १०२ व्या घटनादुरुस्ती विधेयकात बदल केला आहे. या नव्या बदलांना केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी मिळाली.
Read Also :
- शरद पवार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट, महाराष्ट्राच्या पूरस्थितीवर चर्चा
- कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी, नियमांचे कठोर पालन करावेच लागेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- ‘नॉट रिचेबल’ देशमुखांच्या नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजवर ईडीची छापेमारी
- मुंबई लोकलबद्दल पुढच्या दोन दिवसात निर्णय होणार; आदित्य ठाकरेंचे महत्वपुर्ण विधान
- राज्यातील कलाकारांना मोठा दिलासा: प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार