मुंबई: राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप पाठोपाठ आता काँग्रेसनेही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या डिसेंबरमध्ये दादरमधील शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मोठ्या सभेला संबोधित करणार आहेत. या सभेतून काँग्रेस निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे.
हे पण वाचा: “सेनेची ताकदच दाखवायची असेल, तर मुंबई महापालिकेची निवडणूक लढवा” पाटलांचे राऊतांना आव्हान
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीनंतर एच.के.पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निवडणुकीपूर्वी मुंबईत काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिवाजी पार्क येथे २८ डिसेंबरला हा मेळावा पार पडले.
हे पण वाचा: “अहमदाबादच्या क्रिकेट स्टेडियमलाही खेळाडूंचेच नाव द्या”, नामकरणाच्या वादावरून काँग्रेसची आक्रमक मागणी
अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे मेळाव्याला उपस्थितीत राहणार आहे. काँग्रेस स्थापना दिवस पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम असेल, असं पाटील यांनी सांगितलं. काल मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीत चर्चा झाली असली तर आघाडी कोणाशी करावी का? या बाबत कुठलीही चर्चाझाली नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
हे पण वाचा:मनसे नेत्याची मोठी प्रतिक्रिया, “मनसे आणि भाजप एकत्र आले तर आनंदच!”
तसंच, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलणे हे राजकीय द्वेषभावनेने प्रेरित केलेले कृत्य आहे. या आधी ध्यानचंद यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार आहे. पण, तरीही नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली.
Read Also :
- ‘आधी अधिकार नाही म्हणून ओरडायचे, आता अधिकार दिले तर काय फायदा म्हणतात!’, मेटेंची चव्हाणांवर टीका
- शरद पवार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट, महाराष्ट्राच्या पूरस्थितीवर चर्चा
- कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी, नियमांचे कठोर पालन करावेच लागेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- ‘नॉट रिचेबल’ देशमुखांच्या नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजवर ईडीची छापेमारी
- मुंबई लोकलबद्दल पुढच्या दोन दिवसात निर्णय होणार; आदित्य ठाकरेंचे महत्वपुर्ण विधान