औरंगाबाद: राज्यात ओबीसींना वगळून कोणत्याच निवडणुका होणे शक्य नाही. ओबीसींचे आरक्षण त्यांच्या हक्काचे आहे. त्यामुळे जोपर्यंत इम्पिरिकल डाटा मिळवून आरक्षण अबाधित केले जात नाही, तोपर्यंत राज्यातील कोणत्याही निवडणुका शक्य नाहीत, असे राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी येथे सांगितले.
हे पण वाचा: भाजपच्या ३ बड्या नेत्यांची दिल्लीवारी, राज्याच्या नजरा लागल्या राजधानीकडे; राजकीय वर्तुळात चर्चा
हे पण वाचा: शरद पवार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट, महाराष्ट्राच्या पूरस्थितीवर चर्चा
वडेट्टीवार दोन दिवस औरंगाबाद- जालन्याच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी सायंकाळी ते औरंगाबादेत आले. विभागीय आयुक्तालयात मराठवाड्यातील आश्रमशाळांच्या समस्यांबाबत आढावा बैठक घेण्यापूर्वी त्यांना पत्रकारांनी बोलते केले. ते म्हणाले की, मागासवर्ग आयोगासाठी लागणारा निधी देण्यात येईल. ओबीसी आरक्षणापेक्षा निधी मोठा नाही. आम्हाला हक्काचे आरक्षण मिळावे आणि ते टिकावे, हीच भूमिका आहे.
हे पण वाचा: “भेटीवर बंधन नाही, पण राजकारणात जर-तरला महत्त्व नसते”, पाटील-ठाकरे भेटीवर फडणवीसांचे विधान
हे पण वाचा: राज्यातील कलाकारांना मोठा दिलासा: प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार
यासाठी माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर येत्या आठवड्यात सुनावणी होणे शक्य आहे. ओबीसी आरक्षणाचा निर्णय केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तो पूर्ण देशासाठी लागू झालेला आहे. त्यामुळे देशातच ओबीसींना वगळून निवडणुका होणे शक्य नाही. त्यासाठी इम्पिरिकल डाटा सर्व राज्यांना मिळवावा लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने केंद्र शासनाकडून तो डाटा मिळावा, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.
Read Also :
- ‘तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही काही बोललो का?’, राऊतांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर
- साहेब तुम्ही, पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा, अशीही जनतेची मागणी, राष्ट्रवादीचा मोदींना टोला
- राष्ट्रीय ओबीसी महासंघांचं नागपुरात अधिवेशन, आज ठरणार ओबीसींच्या पुढील लढ्याची दिशा
- मुंबई निवडणुकीसाठी काँग्रेसची मोठी घोषणा, सोनिया गांधी, राहुल गांधी २८ डिसेंबरला शिवाजी पार्कवर
- ‘आधी अधिकार नाही म्हणून ओरडायचे, आता अधिकार दिले तर काय फायदा म्हणतात!’, मेटेंची चव्हाणांवर टीका