पुणे – पेपरफुटीप्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कानपिचक्या दिल्या आहेत. शहाण्यांना शहाणं करण्यासाठीच अध्यापक विकास संस्था काम करणार आहे, असं सांगतानाच कोण सुपे? त्यांच्याकडे नोटा सापडत आहेत. त्याचे धागेदोरे कुठपर्यंतही जाऊ द्या, त्यांच्यावर कारवाई होणारच, असा इशाराच अजित पवार यांनी दिला.
विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून संग्राम थोपटे निश्चित?
महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी अजित पवार यांनी शिक्षकांनाही कानपिचक्या दिल्या. शहाण्यांना अधिक शहाणं करण्यासाठी ही संस्था काम करणार आहे. यशदा या संस्थेमार्फत या आधी प्रशिक्षण दिले जात आहे. नवीन नवीन गोष्ट देण्याकरिता राज्य सरकारने पुढे राहिले पाहिजे. सारथीच्या इमारतीचे काम लवकरच सुरू करायचे आहे. मुख्यमंत्र्यांची तारीख मिळाल्यावर त्याचे भूमीपूजन केले जाणार आहे, असं अजित पवार म्हणाले.
काळ बदलला आहे. विद्यार्थी बदलले आहेत. त्यामुळे शिक्षकांनी बदलले पाहिजे. आजचे विद्यार्थी शिक्षकांपेक्षा हुशार झाले आहेत. इंटरनेटमुळे जगाशी जोडले गेले आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात काय माहिती मिळते यासंदर्भात आजचे विद्यार्थी जागृत आहेत. शिक्षकांनी नवा दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे, त्यासाठी ही संस्था सुरू करण्याचा उद्देश आहे, असं त्यांनी सांगितलं.
लोकशाहीचे रक्षक असाल तर अधिवेशनाचा कालावधी वाढवा; मुनगंटीवारांची मागणी
आपल्यात काही अधिकाऱ्यांना जास्त अधिकार दिले आहेत. त्याचा ते गैरफायदा घेतात. आता ते सुपेंचं ताज ताज उदाहरण आहे. कोण सुपे? त्याच्याकडे नोटा सापडत आहेत. कुणीही असो. त्याचे धागेदोरे कुठेही जाऊदे. त्यांच्यावर कारवाई होणारच. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार कुणाला नाही, असा इशाराच त्यांनी दिला.
Read also:
- सायबर पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
- फोन टॅपिंग अहवाल गहाळ प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना सायबर पोलिसांचे समन्स
- “महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीपेक्षाही भयानक”; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर निशाणा
- ही प्रजाती फक्त भंगारात आढळते; डुकराचा फोटो शेअर करत नितेश राणेंनी केली ‘या’ मंत्र्यावर टीका
- २१६ जिवंत व्यक्तींचा मृतांमध्ये समावेश; शासनाचा गलथान कारभार की ५० हजारांची लालसा?