मुंबई – आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा समावेश असलेल्या राज्य गुप्तचर विभागाच्या (एसआयडी) कागदपत्रं गहाळ प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सायबर सेलकडून समन्स बजावण्यात आलं आहे. सायबर सेलने साक्षीदार म्हणून त्यांचं म्हणणं नोंदवण्यासाठी समन्स बजावण्यात आलं असल्याची माहिती शुक्रवारी मॅजिस्ट्रेट कोर्टात दिली. फडणवीस यांनी मार्चमध्ये दिलेल्या मुलाखतीचा हवाला देत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून कागदपत्रे मागण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली आहे. पोलिसांच्या याचिकेवर न्यायालय मंगळवारी निर्णय देणार आहे. दरम्यान यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवा अध्यक्ष कोण? विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 28 डिसेंबरला होणार
२३ मार्च २०२१ रोजी एका पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तींमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी काही कागदपत्रे आणि तत्कालीन एसआयडी आयुक्त रश्मी शुक्ला यांनी त्यांच्या आरोपांच्या समर्थनार्थ तयार केलेल्या अहवालांकडे लक्ष वेधलं होतं. त्यांनी असा दावा केला होती की, राज्याने अहवालावर कारवाई केली नाही आणि म्हणून ते पेन ड्राईव्हसह संपूर्ण साहित्य गृहमंत्रालयाकडे सोपवणार आहेत.
विदर्भ-मराठवाडा महाराष्ट्रात येतो का, तुम्ही आपलं मानता का? फडणवीसांचा रोखठोक सवाल
गृह मंत्रालयाकडून कागदपत्रे आणि तांत्रिक पुरावे मागणाऱ्या राज्य सरकारने दाखल केलेल्या अर्जावर मॅजिस्ट्रेट कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी फडणवीसांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती देण्यात आली.“मला सायबर सेलने चौकशीसाठी बोलावलं नसून एक प्रश्नावली पाठवली आहे. त्यानंतर सायबर सेलचं एक पत्र मिळालं असून त्यावर योग्यवेळी बोलेन असं सांगितलं आहे. न्यायालयीत प्रकरणानंतर त्यावर मी बोलेनच. विरोधी पक्षनेता म्हणून भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढण्याचा माझा अधिकार आहे. त्यासाठी माहिती कुठून मिळाली हे विचारण्याचा सरकारला अधिकार नाही,” असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
Read also:
- फोन टॅपिंग अहवाल गहाळ प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना सायबर पोलिसांचे समन्स
- “महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीपेक्षाही भयानक”; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर निशाणा
- ही प्रजाती फक्त भंगारात आढळते; डुकराचा फोटो शेअर करत नितेश राणेंनी केली ‘या’ मंत्र्यावर टीका
- २१६ जिवंत व्यक्तींचा मृतांमध्ये समावेश; शासनाचा गलथान कारभार की ५० हजारांची लालसा?
- राणेंच्या म्याव म्यावचे विधानसभेत पडसाद; फडणवीस, पवार, मुनगंटीवारांनी टोचले राणेंचे कान