मुंबई : महाविकास आघाडी सरकारकडून विदर्भ आणि मराठवाड्यावर अन्यायांची मालिका सुरु आहे. विदर्भ-मराठवाड्याचा वापर हा एखाद्या वसाहतीप्रमाणे केला जात आहे. मुळात हे सरकार मराठवाडा आणि विदर्भाला महाराष्ट्राचा भाग मानतात का, हाच प्रश्न असल्याची जळजळीत टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठवाडा आणि विदर्भासाठीच्या योजनांना लावण्यात आलेल्या कात्रीवरुन फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
ओबीसी आरक्षणासाठी फडणवीस दिल्लीला जाणार असतील तर तिकीट काढून देतो – छगन भुजबळ
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, आपण नेहमी सांगतो, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची लढाई आपण लढलो. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, ही घोषणाही देतो. यासाठी आपण लढलंच पाहिजे, आपला हक्क मिळेपर्यंत आपण भांडणार आहोत. पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की, विदर्भ-मराठवाडा महाराष्ट्रात येतो का? तुम्ही विदर्भ-मराठवाड्याला महाराष्ट्राचा भाग मानता का? हे दोन्ही भाग सरकारच्या खिजगणीतही नाहीत. प्रत्येकवेळी सरकार नागपूरात अधिवेशन घेणार सांगते. मात्र, ते कधीच घेतले जात नाही, याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
शक्ती कायद्याला विधानसभेत एकमताने मंजुरी; विरोधकांनीही दिला पाठींबा
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात विदर्भ आणि मराठवाड्यासाठीच्या वैधानिक विकास मंडळाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला धारेवर धरले. वैधानिक विकास मंडळं ही विदर्भ आणि मराठवाड्याला मिळालेली कवचकुंडलं होती. खूप मोठ्या संघर्षानंतर ही कवचकुंडलं आम्हाला मिळाली होती. विरोधी पक्षात असताना आम्ही या कवचकुंडलांचा वापर करुन सरकारला विदर्भ आणि मराठवाड्याचा न्याय द्यायला लावायचो. आम्ही सत्तेत आल्यानंतर या मंडळांना मुदतवाढ देण्यात आली, निर्देशांची पूर्तता केली. मात्र, महाविकासआघाडी सरकारने वैधानिक विकास मंडळांचा मुडदा पाडला. आता कुठलेही निर्देश नाहीत, अनुपालन नाही. या सरकारने विदर्भ आणि मराठवाड्यावर अन्यायाची मालिका सुरु केली आहे. या दोन्ही भागांचा वापर एखाद्या वसाहतीप्रमाणे केला जात असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Read also:
- नवा अध्यक्ष कोण? विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 28 डिसेंबरला होणार
- ५ राज्यांमध्ये निवडणूका पुढे ढकलण्यामागे भाजपचा मोठा डाव; नवाब मालिकांचा खळबळजनक आरोप
- आमच्या जीवावर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची चैन सुरु; कोल्हापुरात शिवसेनेची विरोधकांवर जहरी टीका
- राज्यात पुन्हा एकदा लागणार ‘निर्बंध’; रात्रीची जमावबंदी, नवीन नियमावली होणार आज जाहीर
- शिवसेनेची अवस्था ‘म्याव म्याव’ सारखी झाली आहे; आमदार नितेश राणेंचा घणाघात