मुंबई – आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. भाजपाकडून आज कोणत्या विषयांवरून चर्चा होणार यासंदर्भातील संकेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. आज विधान भवनात येण्याआधी भाजपा नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दोन्ही नेत्यांनी अधिवेशनाच्या कालावधी वाढवून घेण्याचे भाजपाचे प्रयत्न असतील, असे म्हटले आहे. याच मुद्द्यावरून मुनगंटीवर यांनी सत्ताधाऱ्यांना टोलाही लगावला.
मनसेला मोठं खिंडार: औरंगाबादेतील तब्बल 53 कार्यकर्त्यांचे एकाच वेळी राजीनामे
सुधीर मुनगंटीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली आहे. राज्याचे बरेचकाही प्रश्न प्रलंबित आहेत. आजच्या अधिवेशनात अनेक प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. लोकशाहीचे रक्षक असाल तर अधिवेशनाचा कमीत कमी एक आठवडा कालावधी वाढवला पाहिजे, अशी मागणी करत लोकशाहीचे भक्षक असतील तर अधिवेशन लवकरच संपवतील, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.
राज्याचे अर्थचक्र कोमात गेले आहे, अनेक रोजंदारी कामगारांचे प्रश्न आहेत, धानाचा बोनस दिला नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कोरोनाच्या कालावधीत झालेला भ्रष्टाचार आहे, आरोग्य सेवेचं अपग्रेडेशन झाले नाही, मंत्रालय भ्रष्टाचाराचे अड्डे, मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडत आहेत. या सारख्यां अनेक विषय आहेत जे सभागृहात मांडायचे आहे. सोबतच पेपरफुटीसारखे घाणेरडे पाप या राज्यात होत आहे. त्यामुळे हे लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर सरकारने अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी मागणी भाजपाने केली आहे.
Read also:
- विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून संग्राम थोपटे निश्चित?
- विदर्भ-मराठवाडा महाराष्ट्रात येतो का, तुम्ही आपलं मानता का? फडणवीसांचा रोखठोक सवाल
- नवा अध्यक्ष कोण? विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 28 डिसेंबरला होणार
- ५ राज्यांमध्ये निवडणूका पुढे ढकलण्यामागे भाजपचा मोठा डाव; नवाब मालिकांचा खळबळजनक आरोप
- आमच्या जीवावर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची चैन सुरु; कोल्हापुरात शिवसेनेची विरोधकांवर जहरी टीका