कोल्हापूर : काही दिवसांपूर्वी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत, अजित पवारांच्या सीबीआय चौकशीची मागणी करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. यातच आता, महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात ईडीने अजित पवारांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे, यांच्या जरंडेश्वर कारखान्यावर ईडीकडून जप्तीची मोठी कारवाई करण्यात आली असून, या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने आपला गुन्हा दाखल केला आहे. तसेच, आता पुढील कारवाई केली जाणार आहे.
अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या कारखान्यवर कारवाईचा बडगा; ईडीकडून जप्तीचे आदेश
दरम्यान, यावर आता राज्यतल्या इतरही पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून, “राजकीय हेतूने साखर कारखान्यांवर कारवाई केली जाते. मग अशा एकच का? ४३ साखर कारखान्यांवर कारवाई झाली पाहिजे,” अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी, पत्रकारांशी बोलताना केली आहे. तसेच, ईडीकडून केली जाणारी कारवाई, राजकीय दबाव वाढवण्यासाठी केलेली असू शकते,” असा आरोपही त्यांनी केला आहे.
मोठी बातमी! ईडीने केली अजित पवारांच्या निकटवर्तीयावर मोठी कारवाई
तसेच, “मी कित्येक दिवसांपासून सांगतोय, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय या सगळ्या केंद्रीय यंत्रणा, केंद्र सरकारच्या हातातली हत्यारं झाली आहेत आणि त्यांचा उपयोग राजकीय दृष्ट्या ब्लॅकमेल करण्यासाठी होत आहे. हा तसाच प्रकार आहे. राज्यात एकूडन ४३ साखर सहकारी कारखाने आहेत, ते सगळेच कवडीमोल किमतीने विकले गेले आहेत. यासाठी जबाबदार असणाऱ्या ८९ व्यक्तींसंदर्भात मी, मुंबई उच्च न्यायालयात ५ वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती. मात्र, याची एकाही केंद्रीय यंत्रणेकडून चौकशी झाली नाही,” असे त्यांनी सांगितले.
“चंद्रकांतदादा महसूलमंत्री होते, तेव्हा त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते”
“मी ईडी, आयकर विभागा, सीबीआयच्या दारात सातत्यने हेलपाटे घातले. त्यावेळी सगळ्या यंत्रणांनी माझ्याकडे दुर्लक्ष केले. राज्यातले हे ४३ सहकारी साखर कारखाने, सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आहेत. त्यामुळे, या सगळ्या साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी झालीच पाहिजे. मी पुरावे सादर केले होते, तेव्हा ईडी झोपली होती काय? सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून या कारखान्यांवर दरोडा टाकला आहे, म्हणूनच या सगळ्या साखर कारखान्यांवर आता ईडीने कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
Read Also :
- “कोणी कितीही आपटली, तरी अध्यक्षपदी महाविकास आघाडीचाच उमेदवार येणार”
- अधिवेशनाचा कालावधी वाढवणार नाही; राज्यपाल कोश्यारींच्या पत्राला ठाकरेंचे उत्तर
- देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात तब्बल दोन तास गुप्त बैठक
- मराठा आरक्षण, केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
- सरकार म्हणून आम्ही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत