नवी दिल्ली: राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदावरून, सध्या राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपने वातावरण चांगलेच तापवलेले आहे. एकीकडे सत्ताधाऱ्यांमध्येच अध्यक्षपदाच्या खुर्चीवरून काँग्रेसकडून कोण बसवणार यावरून मतभेद आहेत, तर दुसरीकडे या निवडणुकीत विरोधकांनीही उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यावरून आज शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना, भाजपवर हल्लबोल केला आहे. “खरंतर ही निवडणूक व्हायला नको होती. पण, कुणी कितीही आपटली, तरी विजय हा, महाविकास आघाडीचाच होणार,” असा दावा त्यांनी केला आहे.
अधिवेशनाचा कालावधी वाढवणार नाही; राज्यपाल कोश्यारींच्या पत्राला ठाकरेंचे उत्तर
“विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे प्रश्न, दिल्लीत का विचारले जातात? याबाबत जे जबाबदार व्यक्ती आहेत, तेच सांगू शकतील. मी त्यावर वक्तव्य करण्यासाठी स्वतःला जबाबदार व्यक्ती समजत नाही. त्यामुळे, मी उत्तर देणार नाही. मात्र, सध्याच्या काळात ही निवडणूक टाळायला हवी होतं, असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं. ते योग्यच होतं. मात्र, आता ती होणार आहे. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आमदार येणार आहेत. टेस्टशिवाय त्यांना प्रवेश नाही. त्यामुळे, एखादा आमदार बाहेर राहिला, तर निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. पण, कोणी कितीही आपटली तरी विजय हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचाच होणार,” असा दावा त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीसांना केंद्रात मंत्रिपद मिळणार का?; फडणवीस म्हणतात…
तसेच, “विरोधकांनी निवडणूक टाळली, तर उपकार होतील. त्यांनी कितीही आरडाओरडा केला, कितीही आजूबाजूला संशयाचं वातावरण निर्माण केलं, तरीही त्यांना यश मिळणार नाही. जिंकणार तर आम्हीच! पण विरोधकांनी सामंजस्याने भूमिका घ्यायला हवी होती,” अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी, अजित पवारांच्या मामांवर ईडीने केलेल्या कारवाईवर भाष्य करताना, “सत्तेत असणाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका कारखान्यावर लाखों लोकांचं जीवन अवलंबून असतं. हे शुद्ध राजकारण नाही. उघडपणे लढाई करावी, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ईडी, सीबीआयचा वापर हा पाठीतला वार आहे. हे राज्याला शोभा देत नाही,” अशी नाव न घेता टीका त्यांनी भाजपवर केली आहे.
Read Also :
- देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात तब्बल दोन तास गुप्त बैठक
- माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यापूर्वी आळंदीच्या नगराध्यक्षांसह ३७ वारकरी कोरोना पॉझिटिव्ह
- मराठा आरक्षण: केंद्रानेच आता भूमिका स्पष्ट करावी; संभाजीराजेंनी सांगितला उरलेला एकच पर्याय
- नंदुरबारमध्येही महाविकास आघाडीत फूट,पोटनिवडणुकीत तिन्ही पक्ष स्वबळावर
- नितीन राऊत माझ्यात भांडण लावणे बरोबर नाही! चुकीची बातमी दाखवल्यानंतर नाना पटोले संतापले…