मुंबई : दसऱ्या मेळाव्यासाठी शिवतीर्थ मैदान ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे. कारण शिंदे गटाने मैदान मिळवण्यासाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. यावरून आता शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. यावरून ज्या शिवाजी पार्कात शिवसेनेची स्थापना झाली, तिथे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी काॅंग्रेसला गाडण्याची भाषा केली. तिथेच आता उद्धव ठाकरे गट काॅंग्रेसवर फुलं उधळणार आहे. काॅंग्रेसचे विचार मांडणार अशी टिका एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यावर आता संजय राऊत यांनी पलटवार केलाय.
हेही वाचा…पार्थ पवारांना राजकारणात आणण्यासाठी अजित पवारांनी दिला राजीनामा ? नेमकं काय घडलं?
बाळासाहेब ठाकरे यांनी कमळाबाईच्या पदराखाली राजकारण करण्याचं धोरण कधी स्वीकारलं नाही. आम्ही काॅंग्रेसबरोबर आहोत, राष्ट्रवादी काॅंग्रेसबरोबर आहोत, कारण ही या महाराष्ट्राची राजकीय अपरिहार्यता आहे. असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. त्यानंतर आम्ही आरसा पाहू, नाहीतर आणखी काही पाहू, परंतु तुमच्याकडे कोणता वारसा आहे ते सांगा. हल्ली तुम्ही सकाळी उठल्यापासून फक्त नमो-नमो चा जप करताय असा टोलाही शिंदेंना राऊतांनी लगावला आहे.
हेही वाचा…“आम्ही ठरवले असते तर शिवतीर्थावर सभा घेतलीही असती, पण..,”दसरा मेळाव्यावरून शिंदेंनी घेतली माघार
दरम्यान, मागील काही दिवसापासून शिवतीर्थ मैदानावरून ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. यातच आता शिंदे गटाने शिवतीर्थ मैदानावरून माघार घेतली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार टिका केली होती.
READ ALSO :
हेही वाचा…ललित पाटीलसाठी रूग्णालयात महिला कोण पाठवायचा ? धंगेकरांनी आणखी एक बॉ’म्ब टाकला
हेही वाचा…“२५ वर्षे सत्तेत राहून सत्ता उपभोगून आता शरद पवारांना हुकूमशहा म्हणताहेत”, कोणी केला पलटवार?
हेही वाचा…नबाम रेबिया केसचा पुनर्विचार करण्यास सुप्रीम कोर्ट तयार, शिंदे गटाला मोठा धक्का बसणार ?
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची आज मुंबईत खलबत्तं, अजित पवार मोठा निर्णय घेणार
हेही वाचा…“सरकारमध्ये १०० दिवस झाल्याने अजित पवारांचं पत्र, शरद पवार गटाने साधला जोरदार निशाणा, म्हणाले,..