पुणे : राज्यात मागील काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाच सुरू आहे. शिंदे सरकारमधील अनेक मंत्र्यांनी महापुरूषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केली. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देखील यामुळेच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. यातच आता शिंदे सरकारमधील माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
“कोश्यारींच्या जागी, सुमित्रा महाजन की अमरिंदरसिंग ?,; येत्या 15 दिवसात राज्याचा राज्यपाल ठरणार”
महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसे यांनी केली आहे. हे निषेधार्थ आहे. परंतु महात्मा गांधींच्या विचारांचा खून पंडीत नेहरूंनी केला आहे. हे आपल्याला स्विकारावचं लागेल. महात्मा गांधी यांनी सांगितलं की खेड्याकडे चला. पण नेहरूंनी सांगितलं की खेडी लुटा. असंही सदाभाऊ खोत यांनी सांगितलं आहे. त्यांच्याविरूद्धात राजकीय नेेते काय भूमिका घेणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
“आयुष्य अन् समाज घाण घडवणे हा भाजपचा एकच कार्यक्रम”, रूपाली पाटील भाजपवर संतापल्या
युवा संवाद कार्यक्रमात सदाभाऊ खोत यांनी महात्मा गांधीबाबत वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read also
- “सत्यजीत तांबेंना निवडून आणण्यासाठी मैदानात उतरा”, भाजपकडून कार्यकर्त्यांना आदेश
- भोसरीतील ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात ८ हजार विद्यार्थी- पालकांचा सहभाग , मोदींच्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण
- “कितीही गुन्हे दाखल करा, माझ्यावर त्याचा काहीही फरक पडणार नाही”, संतोष बांगर
- “बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकरांना भाजप विसरले”, सामानातून भाजपवर हल्लाबोल
- “पोटनिवडणुका बिनविरोध होण्यासाठी भाजप सर्व पक्षांना पत्र पाठवणार”