पुणे : राज्यात काल झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीवर मोठी बाजी मारली आहे. राज्यातील २३५९ ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान झालं होतं. त्यानंतर काल त्याची मतमोजणी करण्यात आली. यामध्ये महायुतीला 1328 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला तर महाविकास आघाडीला फक्त 526 ग्रामपंचायती ताब्यात आल्या आहेत. यातच पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत महायुती सुसाट असल्याचं दिसत आहे.
हेही वाचा…“तुम्ही तर आमचा जीव घ्यायला निघालेत”? मनोज जरांगे पाटलांचं भुजबळांना जोरदार प्रत्युत्तर
पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला २२८ पैकी १५३ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप आणि शिंदे गट यांनी बाजी मारली आहे. महाविकास आघाडीला ६५ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. भाजपसोबत अजित पवार गट गेल्यामुळे पुणे जिल्ह्यात युतीची ताकद वाढली आहे. या निकालाचे महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“मावळचा खरा सरदार कोण ?” ग्रामपंचायत निकालावरून भाजप अन् राष्ट्रवादीमध्ये जोरदार खडाजंगी
दरम्यान, काल झालेल्या एकूण २३५९ ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये भाजपला ६५५, शिंदे गट २८९, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला ३९२ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. तर काॅंग्रेसला २७१, शरद पवार गट १४५ तर उद्धव ठाकरे गटाला ११० ग्रामपंचायती मिळाल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“जवा घोटाळे आणि भ्रष्टाचाराची होते नांगरट, तवा..,”ठाकरेंवर टिका, सुषमा अंधारेंचं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“पालिकांच्या निवडणुका घ्यायला यांची हातभर फाटते अन् ग्रामपंचायत निवडणुका..”, राऊतांनी महायुतीला डिवचलं
हेही वाचा…“पंचायत टू पार्लमेंट’ केवळ आणि केवळ आणि चप्पा-चप्पा भाजपा”, ग्रामपंचायत निकालानंतर फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…ग्रामपंचायती निवडणुकीत ठाकरेंना मिळाल्या कमी जागा, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
हेही वाचा…‘या’ तालुक्यात भाजपला एकही जागा जिंकता आली नाही, सगळ्या पक्षांना धक्का देत अपक्षांनी मारली बाजी