मुंबई : राज्यात काही दिवसांपासून बाधित रुग्णसंख्येमध्ये, सातत्याने होणारी घट, लॉकडाऊनमध्ये शिथीलता की वाढ, तिसऱ्या लाटेबद्दलची अनिश्चितता, तौक्ते चक्रीवादळ, राज्य सरकार महामारी उच्चटनासाठी करत असलेल्या उपाययोजना आणि त्यांची अंमलबजावणी, या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी, ‘माझे गाव करोनामुक्त’ ही संकल्पना मांडली. तसेच, हिवरेबाजार या गावच्या पोपटराव पवारांसोबतच, ऋतुराज देशमुख, कोमल ताई यांसारखे सरपंच, महामारीच्या उच्चाटनासाठी घेत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी विशेष दखल घेत, त्यांचे कौतुक करत, यांचा आदर्श समोर ठेऊन आपण आपले गाव महामारी मुक्त केले, तर आपले राज्य महामारी मुक्त होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही,’ असे सांगितले.
“आज महामारीला नष्ट करण्यासाठी जसे वैद्यकीय उपचारांचे महत्व आहे, तसेच लोकांमध्ये जागृती आणि त्यांचा सहभागही फार महत्वाचा आहे, असे सांगत, ‘सरकार एकट्यानेच हा लढा लढू शकत नाही. हिवरे बाजार सारखे शिस्तबद्ध रीतीने रोगाचा मुकाबला केल्यास आपल्यालाही महामारीमुक्त करता येऊ शकेल आणि म्हणूनच हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन, राज्यातील गावांनी नियोजन करावे, असे आवाहन देखील त्यांनी राज्यातील गावांना आणि सरपंचांना केले.
यावेळी, ‘कोविड परिस्थितीत निश्चित असे वैद्यकीय उपचार नसल्याने, तसेच विषाणूच्या सतत बदलत जाणाऱ्या अवतारांमुळे वैद्यकीय क्षेत्रासमोर आज आव्हान उभे राहिले आहे, असे सांगत त्यांनी, ‘हे सर्व लक्षात घेऊन आम्ही सातत्याने सर्व डॉक्टर्सशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. त्यानुसार आजपर्यंत एकूण सुमारे ४५ हजार डॉक्टर्स (प्रत्यक्ष सहभागातून) आणि ५० हजार दर्शक असे १ लाख डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रातील इतरांशी उपचारासंदर्भात टास्क फोर्सचा संवाद झाला,’ असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
दरम्यान यावेळी त्यांनी, तिसऱ्या लाटेत मुलांमध्ये संसर्ग होऊ शकतो ही भीती देखील वर्तवली. मात्र, यासाठी राज्य सरकारने योग्य त्या उपाययोजना केल्या असून, महाराष्ट्र देशातले पहिले राज्य आहे, ज्यांनी तज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स स्थापन केला आहे,’ असे सांगितले. तसेच, सर्व जिल्ह्यांत स्थानिक तज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स स्थापन केले असून, लहान मुलांमधील कोविडसंदर्भात बाल रोग तज्ञांचा टास्क फोर्स देखील नेमण्यात आला आहे आणि दोन्ही टास्क फोर्समध्ये वैद्यकीय उपचारासंदर्भात सतत संवाद होत असतात,’ अशी माहिती त्यांनी सांगितली.
Read Also :
- ‘सत्तेसाठी आधी हिंदुत्व सोडले आणि आता बाळासाहेबांचे विचारही!’
- ‘चंद्रकांत पाटलांना मस्ती आलीये’ – हसन मुश्रीफ
- ‘नव्या भारताचा पाया’ : एकीकडे पुलवामातील शहिदांचा राजकीय वापर; दुसरीकडे गंगेत वाहणारी प्रेतं आणि चितांचा धूर
- ‘निळ्या डोळ्यांच्या मुलासाठी मातोश्रीचं प्रेम इतकं का ऊतू जात आहे?’
- पेट्रोलचा दर पाहून तरुण चक्कर येऊन पडले; पेट्रोल विरोधात नागपूर मध्ये आगळ वेगळं आंदोलन