पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी तब्बल सतरा दिवस उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील आता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहेत. यावेळीचा त्यांचा दौरा वेगळा असणार आहे. अलिकडेच मनोज जरांगे पाटलांची जालन्यात जाहीर सभा पार पडली. यावेळी लाखोंच्या संख्येने गर्दी जमली होती. त्या सभेत मनोज जरांगे पाटलांनी अजून दहा दिवसांचा अल्टिमेटम दिला असून आंदोलनाची पुढची दिशा २४ ऑक्टोंबर रोजी ठरवणार आहे. यातच आता मराठा आरक्षणाबाबत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी लक्ष घालावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा…“भिडे वाड्याचे लवकरच राष्ट्रीय स्मारकात रूपांतर,” उच्च न्यायालयातील खटला महापालिकेने जिंकला
जाहीर सभा घेतल्यानंतर सरकारकडून कोणताही फोन केला नाही. त्याची सध्या गरजही नसून त्यांना दहा दिवसाचा वेळ दिला आहे. मराठा आरक्षण देण्याची इच्छा असेल तर एका तासाच्या आत आरक्षण देऊ शकतात. कारण त्यांच्या समितीकडे सर्व यासंदर्भातील पुरावे आहेत. मला अजूनही सरकारकडून अपेक्षा असून सभेत करोडाच्या संख्येने आले होते. त्यामुळे सरकार आता दखल घेणार अशी आशा मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…“तेव्हा मी त्यांना नकार दिला,”अजितदादांवर आरोप करत मीरा बोरवणकरांनी सगळचं सांगितलं
दरम्यान, मराठा समाज हा देशात सर्वात मोठा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी मराठा आरक्षणात लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. राज्यात देखील मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यावर लवकरात लवकर तोडगा काढणं महत्वाचं आहे. असंही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“राहुल नार्वेकर चोरांना सरंक्षण देताहेत, त्यांचं नाव काळ्या कुट्ट इतिहासात..,” राऊतांचा जोरदार घणाघात
हेही वाचा…“भिडे वाड्याचे लवकरच राष्ट्रीय स्मारकात रूपांतर, चंद्रकांत पाटील आणि महायुती सरकारने केलेल्या पाठपुराव्याला यश”, हेमंत रासने
हेही वाचा…सर्वोच्च न्यायालय आज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार
हेही वाचा…“मीरा बोरवणकर यांचा बोलवता धनी कोण? याचीही चौकशी व्हावी,” अजित पवारांसाठी नेते सरसावले
हेही वाचा…“आघाडी धर्म पाळण्यासाठी त्यांचं ऐकावं लागेल असं सांगण्यात आलं,” मीरा बोरवणकरांचा आणखी एक गौफ्यस्फोट