जालना : आपण एकत्र आल्यामुळे सरकार आपल्यासमोर झुकले आहे. प्रथमच सर्व पक्षांची एकत्रित बैठक घेण्यात आली. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात ठराव करण्यात आला आहे. त्याला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला आहे. स्वातंत्र्यानंतर एखाद्या प्रश्नावर प्रथमच सर्व पक्ष एकत्र आले आहे. असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडणार असल्याचं सुतोवाच केलं आहे. यातच मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारकडे पाच मागण्या ठेवल्या आहेत.
हेही वाचा…उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधवांची नीच…”, भाजपा आमदाराकडून बोचरी टीका
मराठा आरक्षणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी सरकारकडे पाच अटी घातल्या आहेत. यामध्ये अहवाल कसाही येवो, मराठ्यांना ३१ व्या दिवशी राज्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप करायला सुरूवात करायची. हे मला आज लेखी द्यायचे. दुसरी अट अशी आहे की, महाराष्ट्रात जेवढे गुन्हे दाखल झालेत ते सर्व मागे घेतले पाहिजे. तिसरी अट जे अधिकारी दोषी आहेत, त्यांना निलंबित करावे.
हेही वाचा..शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या ‘या’ अपक्ष आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार, ठाकरे गटाची मोठी खेळी
उपोषण सोडायला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सगळे मंत्रिमंडळ, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती उदयनराजे उपस्थित हवेत. सरकार आणि मराठा समाजाच्यामध्ये दोन्ही राजे उपस्थित राहावेत अशी चौथी अट घालण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री किंवा सरकारने हे सर्व आम्हाला लेखी लिहून द्यावे, सरकारने टाईम बॉंन्ड सांगावे अशी अट मनोज जरांगे पाटलांनी अटी घातल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“सगळे पक्ष एकमेकांची चामडी सोलत बसले नसते तर..,” वंचितच्या रेखा ठाकूर यांची जोरदार टिका
हेही वाचा..“सरकार आपल्यासमोर झुकले”, मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेणार?
हेही वाचा…“शिवकार्यात शिवजन्मभूमीचा मावळा म्हणून..,”अमोल कोल्हेंनी शरद सोनवणे यांना दिला पाठिंबा
हेही वाचा…शिवजन्मभूमीचा डंका जगभरात वाजणार, शिवछत्रपतींचा जगातील सर्वात मोठा पुतळा जुन्नरमध्ये उभारला जाणार
हेही वाचा…तीन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार, आज महायुतीच्या समन्वय समितीची महत्वाची बैठक