मुंबई : 1928 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशन समोर जे निवेदन दिले त्यात कुणबी आणि मराठा या दोघांनाही स्थान दिले होते. जे कोणते सरकार सत्तेत आले. त्यांनी मराठ्यांना तात्पुरतं खुश करण्यासाठी एम.जी. गायकवाड आयोगाचा अहवाल, राणे समितीचा अहवाल, BARTI चा रिपोर्ट यांना आधार बनवून कोर्टात आरक्षणाचा मुद्दा मांडला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात परिच्छेद क्र. 215, 243, 245, 303, 305, 306, 312, 313, 314, 320, 325, 326, 444 (1 (II)), 444(15), 444(22), 444 (26) मध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, आम्ही महाराष्ट्र शासनाला या आरक्षणाचे समर्थन करण्यासाठी एम्पिरिकल डाटा सादर करण्याची भरपूर संधी दिली. परंतु भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारांनी हा महत्त्वाचा मुद्दा बदलून टाकला असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केला आहे.
हेही वाचा..शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या ‘या’ अपक्ष आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार, ठाकरे गटाची मोठी खेळी
सर्वोच्च न्यायालयाने जे निकालात लिहिलंय ते आम्ही वाचतोय. हा महत्त्वाचा विषय पुन्हा कोर्टापुढे कसा घेऊन जाणार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सांगावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा सविस्तर आराखडा राज्यासमोर मांडणे आवश्यक आहे. इतक्या अल्पावधीत सूचना देऊन आपण सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीआधी काही ठोस पाऊले आपण उचलली असती, तर आज हे सगळे पक्ष एकमेकांची चामडी सोलत बसले नसते. हे चामडी सोलनं आणि अशी चालढकल करणं हे आरक्षणासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी चांगलं नाही. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीस बेईमानी करणार नाहीत, उपोषण मागे घ्या,” संभाजी भिंडेंची मागणी
दरम्यान, मुख्यमंत्री आणि सर्व मराठा नेत्यांनी एकत्र जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली पाहिजे आणि त्यांच्याकडे काही फॉर्म्युला असेल तर तो त्यांच्यासमोर मांडून त्यांचा जीव वाचवला पाहिजे. नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. आणि यासाठी फक्त आणि फक्त मुख्यमंत्री व मराठा नेतेच जबाबदार असतील. असंही त्या म्हणाल्या.
READ ALSO :
हेही वाचा..“सरकार आपल्यासमोर झुकले”, मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेणार?
हेही वाचा…“शिवकार्यात शिवजन्मभूमीचा मावळा म्हणून..,”अमोल कोल्हेंनी शरद सोनवणे यांना दिला पाठिंबा
हेही वाचा…शिवजन्मभूमीचा डंका जगभरात वाजणार, शिवछत्रपतींचा जगातील सर्वात मोठा पुतळा जुन्नरमध्ये उभारला जाणार
हेही वाचा…तीन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार, आज महायुतीच्या समन्वय समितीची महत्वाची बैठक
हेही वाचा…उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधवांची नीच…”, भाजपा आमदाराकडून बोचरी टीका