पुणे : पुण्यातील अत्यंत चर्चेत आलेल्या चांदणी चौकाच्या नूतनीकरणाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्या लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्याआधी पुण्यातील अंतर्गत श्रेयवादाच्या लढाईवरून माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलं नाही. तसेच निमंत्रण पत्रिकेवर नाव नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. मेधा कुलकर्णी यांनी यावरून चंद्रकांत पाटलांवर जहरी टिका केल्याने पुण्यातील भाजपचं राजकारण आता चव्हाट्यावर आलं आहे.
हेही वाचा…“हवामान खराब, तरीही शिंदेंचा हॅलिकॉप्टरने प्रवास,” जितेंद्र आव्हाडांचा दावा, केली भावनिक पोस्ट
मेधा कुलकर्णी यांनी यासंदर्भात फेसबुकवर सविस्तर पोस्ट टाकून चंद्रकांत पाटलांवर जोरदार टिका केली आहे. असे निष्ठावंतांचे डावलेले जिणे, माझ्यावरील कुरघोड्या, डावलणे, याबद्दल कधीही वाच्यता केली नव्हती. परंतु विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही केली नाही. पंरंतु चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खुप वाईट वाटले. चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कुणी? असा सवाल करीत मेधा कुलकर्णी यांनी चंद्रकांत पाटलांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
हेही वाचा…“अजितदादा भाजपसोबत, सुळे भाजपविरोधात भांडतात, हा थोडा घोळच”
दरम्यान, माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याचा प्रयत्नात आहेत का ? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मा मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे. माझ्या बाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
मेधा कुलकर्णी यांची पोस्ट
” असे निष्ठावंतांचे डावललेले जिणे ” माझ्यावरील कुरघोडया, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही.. पण आता दुःख मावत नाही मनात.. वाटले बोलावे तुमच्याशी. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले. चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय Nitin Gadkari जी आणि Devendra Fadnavis यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, “तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला”. अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते’ या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते.. माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? मध्यंतरी आदरणीय मोदी जी, आदरणीय अमित शाह जी पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून ‘सर्व ठिकाणी’ चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला दिला नाही. साधे कोथरूड च्या मंडल अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणी मध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे. गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत. देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मा मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे. माझ्या बाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“2024 च्या निवडणुकीचा पराभव मोदींना दिसू लागलाय”, विजय वडेट्टीवारांचा मोदींवर हल्लाबोल
हेही वाचा…“..त्यामुळेच पंतप्रधानांना मणिपूरमधील आग विझवायची नाही”, राहुल गांंधींची मोदींवर टिका
हेही वाचा…शरद पवारांचा मुंबईचा वाघ आज अखेर बाहेर येणार, नवाब मलिकांना जामीन मंजूर
हेही वाचा…नवाब मलिकांना अखेर जामीन मंजूर, शरद पवार की अजित पवार गटात, चर्चांना उधाण
हेही वाचा…हुंडाईंची महाराष्ट्रात 5000 कोटींची गुंतवणुक, रोहित पवारांनी राज्य सराकराला दिला ‘हा’ सल्ला