मुंबई : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर महायुती सरकार सत्तेत आले. परंतु या दरम्यान अनेक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेलेत. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर जोरदार आरोप लावले. यातच आता हुंडाई कंपनीने महाराष्ट्रात येण्याचं निश्चित केल्याचं म्हटलं आहे. हुंडाई कंपनी महाराष्ट्रात गुंतवणुक करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“१६ आमदार अपात्र होणारच, म्हणून विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करताहेत”
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, हुंडाई कंपनीने महाराष्ट्रात येणे निश्चित केले आहे. २०२८ पर्यंत दोन टप्प्यात ५००० कोटींची गुंतवणुक होणार आहे. यातून ४५०० बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे, तसेच त्यांच्या पुरवठादारांची २०२८ पर्यंत ४००० कोटींची गुंतवणुक होणार आहे. त्यांना महाराष्ट्रामध्ये शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असा विश्वास दिला. २०२८ नंतर सुद्धा कंपनी विस्तारीकरणासाठी गुंतवणूक करेल असा शब्द कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. आज झालेल्या भेटी प्रसंगी हुंडाई वरीष्ठ उपाध्यक्ष Choi Dooha विभागप्रमुख Son Jiho, कंपनीचे भारतीय प्रमुख पुनित आनंद तसेच उद्योग प्रधान सचिव हर्षदीप कांबळे एमआयडीसी सीईओ विपीन शर्मा आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. असंही म्हटलं आहे.
हेही वाचा…“..तर मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही हलू दिली नसती”, मोदींच्या ‘त्या’ विधानानंतर ठाकरे गटाच्या नेत्याची टिका
दरम्यान, जनरल मोटर्सचा आणि Hyundai मधील पुण्यातल्या प्लांट सुरू करण्यासंदर्भातली प्रकिया शेवटच्या टप्प्यात असून, या संपूर्ण प्रक्रियेत मात्र जुन्या कामगारांवर अन्याय होत आहे. जुन्या कामगारांचे नुकसान होणार नाही, आणि नव्या कंपनीस उत्पादन सुरु करण्यास अडचण देखील येणार नाही असा तोडगा निघू शकतो, त्या अनुषंगाने देखील राज्य शासनाने प्रयत्न करायला हवेत. असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी म्हटलं आहे.
हुंडाई कंपनीने महाराष्ट्रात येणे निश्चित केले आहे ..2028 पर्यन्त दोन टप्यात 5000 कोटींची गुंतवणूक होणार आहे, ह्यातून 4500 बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे, तसेच त्यांच्या पुरवठादारांची 2028 पर्यंत 4000 कोटींची गुंतवणूक होणार आहे..त्यांना महाराष्ट्रामध्ये शासन सर्वतोपरी सहकार्य करेल… pic.twitter.com/DyqpRnsgKP
— Uday Samant (@samant_uday) August 11, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“हवामान खराब, तरीही शिंदेंचा हॅलिकॉप्टरने प्रवास,” जितेंद्र आव्हाडांचा दावा, केली भावनिक पोस्ट
हेही वाचा…“अजितदादा भाजपसोबत, सुळे भाजपविरोधात भांडतात, हा थोडा घोळच”
हेही वाचा…पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी कोणत्या दादाला संधी, राष्ट्रवादी अन् भाजपमध्ये रस्सीखेच
हेही वाचा…“१५ दिवसांत तोडगा काढा, अथवा मंत्रालयात साप सोडू”, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
हेही वाचा…“..तर मोदींनी शरद पवारांना पंतप्रधान बनवावे”, काॅंग्रेसच्या बड्या नेत्याचं विधान