नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व खासदारांची बैठक महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी एनडीए मधील सर्व खासदारांनी उपस्थिती लावली होती. या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका तर शरद पवार यांच्याबाबत कौतुक केलं आहे. त्यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टिका केली आहे.
हेही वाचा…“वादग्रस्त विधान केल्याच्या प्रकरणात शेलारांच्या विरूद्ध खटला चालवणार का?” कोर्टाचा पोलिसांना सवाल
२०१४ साली दोन- तीन जागांसाठी वाद झाला. तेव्हा तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि नंतर पत्रकार परिषद घेऊन युती तोडली. आताही मातोश्रीवर दिलेल्या शब्दाला छेद कोणी दिला ? हे महाराष्ट्राला माहिती आहे. असं अंबादास दानवे म्हणाले.
हेही वाचा…“नव्याने लढून सर्व उभं करेन, पण भाजपला साथ देणार नाही,” शरद पवारांचं मोठं वक्तव्य
ठाकरे घराणे खोटे बोलते, असं सांगण्याची हिमंत कोणी करू शकणार नाही. कारण, ठाकरे कुटुंबीय शब्दांसाठी बाजी लावणारे आहे. ठाकरे कुटुंबीय सत्तेसाठी हापापलेले असते, तर मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही हलू दिली नसती. भाजपला ठाकरेंचं महत्व माहिती आहे. त्यामुळे ते ठाकरे नाव संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. असंही अंबादास दानवे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपचा दुपट्टीपणा उघड…! राहुल गांधी संसदेत बोलत असतांना कॅमेरा हटवला
हेही वाचा…“दुसऱ्यांची राज्य म्हणजे शत्रू राज्य समजणारी भाजपची चाणक्यनिती”
हेही वाचा…“राहुल गांधींनी प्लाईंक किस दिला, स्मृती ईंराणींचा राहुल गांधींवर गंभीर आरोप”
हेही वाचा…“नरेंद्र मोदींची रावणाशी तुलना, अमित शहा अडाणी, हे मेघनाथ अन् कुभंकर्ण,” राहुल गांधींचा हल्लाबोल
हेही वाचा…“शरद पवारांमध्ये पंतप्रधान पदाची क्षमता, परंतु…”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोठं भाष्य