मुंबई : मागील काही महिन्यापासून ठाकरे गटातील नेते आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या, आशिष शेलार आणि इतर नेते ठाकरे गटातील नेत्यांवर सातत्याने विविध प्रकारचे गंभीर आरोप करतांना दिसत आहेत. यातच आता ठाकरे गटातील नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांनी किरीट सोमय्यांच्या बाबत केलेल्या तक्रारीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…विरोधकांनी नरेंद्र मोदींना घेरले, मणिपुरच्या मुद्यावरून अविश्वास प्रस्तावादरम्यान विचारले तीन प्रश्न
दापोली येथील साई रिसॉर्टचे बांधकाम करतांना नियमांचे उल्लंघन करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री व ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या विरोधात केलेली तक्रार लोकायुक्तांनी फेटाळून लावली आहे. अनिल परब यांच्या रिसोर्टच्या विरोधात सोमय्या यांनी राज्यपालांकडे तक्रार केली होती. त्यानुसार राज्यपालांनी लोकायुक्तांना चौकशी करण्याचा आदेश दिला होता. सोमय्या यांच्या तक्रारीवर लोकायुक्तांकडे सुनावणी झाली होती. लोकायुक्तांनी दोन मुद्यांवर ही तक्रार फेटाळून लावली आहे.
हेही वाचा…“अमित शाहांवर हक्कभंग प्रस्ताव आणला पाहिजे,” संजय राऊतांची मोठी मागणी
दरम्यान, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याच्या प्रकरणात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याविरूद्ध खटला चालवणार का? असा सवाल उच्च न्यायालयाने पोलिसांना केला. याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देत न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठाने सरकारी पक्षाला उत्तर सादर करण्यासाठी शेवटची संधी दिली. या प्रकरणी २५ ऑगस्टला सुनावणी होणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“नव्याने लढून सर्व उभं करेन, पण भाजपला साथ देणार नाही,” शरद पवारांचं मोठं वक्तव्य
हेही वाचा…भाजप नेते किरीट सोमय्या बॅक इन अॅक्शन! १०० कोटींचा पुन्हा घोटाळा उघड
हेही वाचा…मोठी बातमी…! शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात पुढील आठवड्यापासून सुनावणी घेणार
हेही वाचा…काॅंग्रेसने मोठी रणनीती आखली..! काॅंग्रेसचे सगळेच बडे नेते मैदानात उतरणार
हेही वाचा…मोदींनी जगभरात दौरे केले मग मणिपुरचा दौरा का नाही केला ?