नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यापासून मणिपुर मध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसत आहेत. यावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. अविश्वास प्रस्तावावर संसदेत सध्या चर्चा सुरू असून विरोधकांकडून नरेंद्र मोदी सरकारला तीन प्रश्न केले आहेत. यामुळे संसदेत मोठा गोंधळ बघायला मिळाला.
हेही वाचा…ठाकरे अन् राष्ट्रवादीला एकत्रित धक्का, अनेक कार्यकर्त्यांच्या शिंदे गटात प्रवेश
विरोधकांकडून सादर केलेल्या अविश्वास ठरावावर भाजपकडून अमित शहा, निर्मला सीतारामन, किरण रिजिजू, ज्योतिरादित्य शिंदे, स्मृती इराणी, लॉकेट चॅटर्जी, बंदी संजय कुमार, रामकृपाल यादव, राजदीप रॉय, विजय बघेल, रमेश बिधूडी, सुनीता दुग्गल, हीना गावित, निशिकांत दुबे, राज्यवर्धन राठोड यांचा समावेश आहे. तर काॅंग्रेसकडून राहुल गांधी, गौरव गोगोई, मनीष तिवारी, दीपक बैज, अधीर रंजन चौधरी, बेनी बेहनन, हिबी इडन, टी. एन. प्रतापन, डीन कुरियाकोस उपस्थित आज संसदेत आहेत.
हेही वाचा…“राष्ट्रवादीने भाजपशी कितीही सलगी वाढवली तरी भ्रष्टाचारच्या आरोपातून मुक्त होता येणार नाही”
मोदींनी जगभरात दौरे केले तर मणिपुर दौरा का नाही केला ? मणिपुरच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदी गप्प का ? पंतप्रधान गप्प असल्यानेच अविश्वास ठराव आणला गेला आहे. पंतप्रधान मोदी मणिपूरला का गेले नाहीत ? जगभरात दौरे केले मग तिथे का नाही असा सवाल देखील त्यांनी केले आहे.
हेही वाचा…“पक्ष संपल्यावर का होईना मुंबईकर आणि राज्यातील जनतेबद्दल पाझर फुटू लागला”, मनसेंनी ठाकरेंना डिवचलं
लोकसभेत पुन्हा गोंधळ. राहुल गांधींचे भाषण ऐकण्यास आम्ही उत्सुक असल्याचं संसदीय कार्य मंत्र्यांनी लोकसभेत वक्तव्य केलं. त्यावरून लोकसभेत गदारोळ. लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात कांग्रेसनं पत्र दिल्याचा उल्लेख संसदीय कार्य मंत्र्यांनी केला. गौरव गोगोई यांनी आक्षेप घेतला. लोकसभा अध्यक्षांच्या दालनातील चर्चा भाजप कडून उघडपणे मांडण्यात आली. पंतप्रधान मोदी लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात काय बोलतात हे आम्ही सांगायाचे का ? असा टोमणा गौरव गोगोई यांनी लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…विरोधकांनी नरेंद्र मोदींना घेरले, मणिपुरच्या मुद्यावरून अविश्वास प्रस्तावादरम्यान विचारले तीन प्रश्न
हेही वाचा…“अमित शाहांवर हक्कभंग प्रस्ताव आणला पाहिजे,” संजय राऊतांची मोठी मागणी
हेही वाचा…रविंद्र तुपकरांना भाजपकडून ऑफर, पक्ष संघटना फोडण्याचं भाजपचं काम, राजु शेट्टींचा गंभीर आरोप
हेही वाचा…“तेव्हा जगातला सर्वात मोठा पक्ष भाजप डोळे लावून ध्यान करत होता का ?”
हेही वाचा…“अहो, मर्सिडीज बॉय, तेव्हा नाही का सुचली टोल रद्द करण्याची उक्ती?” चित्रा वाघ यांनी ठाकरेंना डिवचलं