मुंबई : गेल्या काही महिन्यापासून मुंबई महानगरपालिकांतील भ्रष्टाचारावरून भाजप आणि ठाकरे गटात जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. सातत्याने भाजप मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावरून ठाकरेंना डिवचण्यात येत आहे. यावरून आता भाजपचे नेते आणि मुंबई शहाराध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली आहे. त्यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पलटवार केला आहे.
हेही वाचा…अंबादास दानवेंसोबतच्या राड्यानंतर भूमरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “आवाज वाढला कारण..”
गेल्या पंचवीस वर्षात मुंबईत रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मुंबईची तुंबई झाली, अनेकजण मॅनहोलमध्ये पडून वाहून गेले. २६ जुलैला तर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली, झाड पडून काहीजण गेले. संडाचा स्लॅब कोसळून काही मुंबईकर चिरडले. तेव्हा मुंबईचे हे तथाकथित कारभारी युवराज म्हणाले नव्हते, मुंबईतकर हो तुम्हाला आम्ही सेवा देण्यात कमी पडलो, तुम्ही पालिकेला कर देणे बंद करा. आज काय सांगतात. रस्त्यावर खड्डे पडले म्हणून टोल भरू नका. असं म्हणत लबाड लांडगा ढोंग करतोय, मुंबईकरांच्या कैवाराचे सोंग करतोय अशी टिका आदित्य ठाकरेंवर शेलारांनी केली.
हेही वाचा…आदित्य ठाकरेंनी आणखी एक घोटाळा बाहेर काढला, खोके सरकार म्हणत टिकाही केली
दरम्यान, शेलारांच्या टिकेला अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काय तो साक्षात्कार झाला आहे. शिवसेना मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या बाकावर बसलेली असताना तुम्ही आणि तुमचा जगातली सर्वात मोठा पक्ष काय डोळे लावून ध्यान करत होतात का ? सत्तेच्या भागीदारी घेऊन पुन्हा हे बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही. मुंबई कोण लुटतंय हे मुंबईकर पाहतो आहेच. ज्या प्रकारे मुंबईकरांच्या ठेवी उडवल्या जात आहेत त्यावरून मुंबईकारांना काही सांगायची गरज नाही. असं दानवेंनी म्हटलंय.
काय तो साक्षात्कार @ShelarAshish तुमचा! शिवसेना मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या बाकावर बसलेली असताना तुम्ही आणि तुमचा जगातील सर्वात मोठा पक्ष काय डोळे लावून ध्यान करत होतात का? सत्तेत भागीदारी घेऊन पुन्हा हे बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही. मुंबई कोण लुटतंय हे मुंबईकर पाहतो… https://t.co/j7RSXBKO55
— Ambadas Danve (@iambadasdanve) August 8, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“अहो, मर्सिडीज बॉय, तेव्हा नाही का सुचली टोल रद्द करण्याची उक्ती?” चित्रा वाघ यांनी ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…ठाकरे अन् राष्ट्रवादीला एकत्रित धक्का, अनेक कार्यकर्त्यांच्या शिंदे गटात प्रवेश
हेही वाचा…“राष्ट्रवादीने भाजपशी कितीही सलगी वाढवली तरी भ्रष्टाचारच्या आरोपातून मुक्त होता येणार नाही”
हेही वाचा…“पक्ष संपल्यावर का होईना मुंबईकर आणि राज्यातील जनतेबद्दल पाझर फुटू लागला”, मनसेंनी ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…“राज ठाकरे फोन उचलणार नाहीत, हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात कसं आलं ? “